शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील २७९९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

मुदत संपुष्टात आलेल्या नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकरिता निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम मागील आठवड्यात ...

मुदत संपुष्टात आलेल्या नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकरिता निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर केलेला आहे. त्यानुसार येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नाशिक महसूल विभागातील नाशिक जिल्ह्यातील ५२१, नगर ७६७, धुळे ५४१, नंदुरबार ८७ अशा २७९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षकांच्या तसेच प्रत्येक जिल्ह्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती विभागीय आायुक्तांनी जाहीर केलेल्या आहेत.

आयुक्तांनी जाहीर केलेल्या निवडणूक निरीक्षकाकडे एक ते दोन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली असून विभागात एकूण ३७ निरीक्षकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. निवडणुकीशी संबंधित सर्व कायदेशीर तरतुदी, नियम तसेच राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले सर्व स्थायी आदेश आणि सूचनांचे पालन होत किंवा नाही याबाबतची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनादेखील करण्यात आलेल्या आहेत. संबंधित निरीक्षकांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांना निरीक्षक पदाचा पदभार सांभाळण्याबाबतचे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. महासूल विभागीय कार्यालयातील उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे कळवण, मालेगाव, चांदवड, देवळा, बागलाण, नांदगावची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्याची जबाबदारी उपायुक्त डी.डी. शिंदे, नंदुरबारसाठी उपायुक्त अर्जुन चिखले, जळगावसाठी उपायुक्त स्वाती देशमुख पाटील तर अहमदनगर जिल्ह्यासाठी सहायक आयुक्त कुंदनकुमार सोनवणे यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.