शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक पार्क उभारणारणीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:19 IST

मालेगाव शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

ठळक मुद्देसुभाष भामरे : मालेगाव येथील मजुंराच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर

मालेगाव : शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. कारखाने सील केले जात असल्यामुळे ७० ते ८० हजार मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या पदाधिकारी व उद्योजकांनी खासदार भामरे यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन अडीअडचणी मांडल्या. राष्टÑीय हरित लवादाच्या निर्देशानंतर प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात १८८ प्लॅस्टिक प्रक्रिया कारखाने आहेत. कारखानदारांची बाजू समजून घेतल्यानंतर खासदार भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, शहरातील १८८ कारखान्यांपैकी १२० कारखाने सील करण्यात आले आहेत. याबाबत सुवर्णमध्य काढला जाईल. येथील प्लॅस्टिक पार्क मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविला जाईल. या प्रकल्पामुळे रोजगाराचा प्रश्न निकाली निघणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. झोडगे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. नार-पारचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले आहे. भाजप शासनाने १४ कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली होती. नदीजोड प्रकल्पाचा रोडमॅप तयार आहे.मांजरपाडा - २ प्रकल्पावर नऊ धरणे उभारण्यात येणार आहे. पाणी चणकापूर धरणात आणले जाईल. यासाठी गुजरातबरोबर समझोता करार करण्याची गरज नाही. या प्रकल्पामुळे कसमादेचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़मालेगाव - धुळे दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर एमएच ४१ क्रमांकाच्या वाहनांना टोल शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली आहे. तसेच पर्यटन विकासांतर्गत भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला होता. याला सध्याच्या शासनाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, तसेच किल्ल्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, हरिप्रसाद गुप्ता यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण