शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

प्लॅस्टिक पार्क उभारणारणीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:19 IST

मालेगाव शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

ठळक मुद्देसुभाष भामरे : मालेगाव येथील मजुंराच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर

मालेगाव : शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. कारखाने सील केले जात असल्यामुळे ७० ते ८० हजार मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या पदाधिकारी व उद्योजकांनी खासदार भामरे यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन अडीअडचणी मांडल्या. राष्टÑीय हरित लवादाच्या निर्देशानंतर प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात १८८ प्लॅस्टिक प्रक्रिया कारखाने आहेत. कारखानदारांची बाजू समजून घेतल्यानंतर खासदार भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, शहरातील १८८ कारखान्यांपैकी १२० कारखाने सील करण्यात आले आहेत. याबाबत सुवर्णमध्य काढला जाईल. येथील प्लॅस्टिक पार्क मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविला जाईल. या प्रकल्पामुळे रोजगाराचा प्रश्न निकाली निघणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. झोडगे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. नार-पारचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले आहे. भाजप शासनाने १४ कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली होती. नदीजोड प्रकल्पाचा रोडमॅप तयार आहे.मांजरपाडा - २ प्रकल्पावर नऊ धरणे उभारण्यात येणार आहे. पाणी चणकापूर धरणात आणले जाईल. यासाठी गुजरातबरोबर समझोता करार करण्याची गरज नाही. या प्रकल्पामुळे कसमादेचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़मालेगाव - धुळे दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर एमएच ४१ क्रमांकाच्या वाहनांना टोल शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली आहे. तसेच पर्यटन विकासांतर्गत भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला होता. याला सध्याच्या शासनाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, तसेच किल्ल्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, हरिप्रसाद गुप्ता यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण