शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

प्लॅस्टिक पार्क उभारणारणीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:19 IST

मालेगाव शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

ठळक मुद्देसुभाष भामरे : मालेगाव येथील मजुंराच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर

मालेगाव : शहर परिसरातील प्लॅस्टिक उद्योगासाठी प्लॅस्टिक पार्क उभारून येथील या प्रक्रिया उद्योगाला उभारी देऊ, अशी माहितीे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. कारखाने सील केले जात असल्यामुळे ७० ते ८० हजार मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या पदाधिकारी व उद्योजकांनी खासदार भामरे यांची येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन अडीअडचणी मांडल्या. राष्टÑीय हरित लवादाच्या निर्देशानंतर प्लॅस्टिक कारखान्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात १८८ प्लॅस्टिक प्रक्रिया कारखाने आहेत. कारखानदारांची बाजू समजून घेतल्यानंतर खासदार भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, शहरातील १८८ कारखान्यांपैकी १२० कारखाने सील करण्यात आले आहेत. याबाबत सुवर्णमध्य काढला जाईल. येथील प्लॅस्टिक पार्क मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविला जाईल. या प्रकल्पामुळे रोजगाराचा प्रश्न निकाली निघणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. झोडगे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. नार-पारचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले आहे. भाजप शासनाने १४ कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली होती. नदीजोड प्रकल्पाचा रोडमॅप तयार आहे.मांजरपाडा - २ प्रकल्पावर नऊ धरणे उभारण्यात येणार आहे. पाणी चणकापूर धरणात आणले जाईल. यासाठी गुजरातबरोबर समझोता करार करण्याची गरज नाही. या प्रकल्पामुळे कसमादेचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़मालेगाव - धुळे दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर एमएच ४१ क्रमांकाच्या वाहनांना टोल शुल्क माफ करावे, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे केली आहे. तसेच पर्यटन विकासांतर्गत भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला होता. याला सध्याच्या शासनाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, तसेच किल्ल्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, हरिप्रसाद गुप्ता यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण