शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शिक्षकांच्या आपसी बदल्यांना लागणार ‘ब्रेक’ स्थायी समितीचा ठराव ठरणार प्रभावी : पत्रांचा अन्वयार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात न्यायालयाचे व ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या पत्रांचा सोयीचा अर्थ काढून या २२७ शिक्षकांच्या समुपदेशनाच्या नावाखाली अर्थपूर्ण घडामोडींनी बदल्या केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात न्यायालयाचे व ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या पत्रांचा सोयीचा अर्थ काढून या २२७ शिक्षकांच्या समुपदेशनाच्या नावाखाली अर्थपूर्ण घडामोडींनी बदल्या केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.दरम्यान, या सर्व बदलीपुराणामागे कसमादे परिसरातील जिल्हा परिषदेच्या एका माजी पदाधिकाºयाची महत्त्वाची भूमिका असल्याची व त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातील एक शिक्षक महत्त्वाचा आशेचा ‘किरण’ ठरल्याचे बोलले जाते. या सर्व घडामोडीत ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ पातळीवर अधिकारी व एका वजनदार नेत्याकडेही अंगुलीनिर्देश करण्यात येत असल्याची चर्चा आहे.ग्रामविकास विभागातील काही वरिष्ठ अधिकाºयांना या बदल्यांमागील ‘गोम’ लक्षात आल्याने त्यांचा अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यास विरोध होता; मात्र कसमादे परिसरातील या माजी पदाधिकाºयाने वजनदार नेत्याच्या मागे पाठपुरावा करून हे पत्रक काढून त्याचा सोयीचा अर्थ काढून लगोलग दोनशेहून अधिक शिक्षकांच्या बदल्यांची समुपदेशनाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला तत्पर केले; मात्र या सर्वांची बोंब झाल्यावर शिक्षक बदल्या इतक्या शांततेत कशा? यामागे काही तरी काळेबेरे असल्याचे सांगत स्थायी समितीतील सदस्यांनी या बदल्यांची कार्यवाही रद्द करावी, तसे बदल्यांचे आदेश काढू नयेत, यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवावे.मार्गदर्शन आल्यानंतर आपसी शिक्षक बदल्यांची कार्यवाही करावी, असा ठराव संमत केला आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.वेळेत कार्यवाही अशक्यया वर्षाच्या सुरुवातीलाच शासनाच्या सचिवांनी न्यायालयात शिक्षकांच्या आपसी बदल्यांबाबत वेळेत कार्यवाही करता येणे शक्य नसल्याचे लेखी दिले होते. तोच धागा पकडत न्यायालयाने शिक्षकांच्या नियमित बदल्या करण्यापूर्वी या आपसी शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले होते. तसेच ग्रामविकास विभागानेही तातडीने यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेला एक पत्र पाठवून आपसी शिक्षक बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते.