शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शिक्षकांच्या आपसी बदल्यांना लागणार ‘ब्रेक’ स्थायी समितीचा ठराव ठरणार प्रभावी : पत्रांचा अन्वयार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात न्यायालयाचे व ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या पत्रांचा सोयीचा अर्थ काढून या २२७ शिक्षकांच्या समुपदेशनाच्या नावाखाली अर्थपूर्ण घडामोडींनी बदल्या केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात न्यायालयाचे व ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या पत्रांचा सोयीचा अर्थ काढून या २२७ शिक्षकांच्या समुपदेशनाच्या नावाखाली अर्थपूर्ण घडामोडींनी बदल्या केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.दरम्यान, या सर्व बदलीपुराणामागे कसमादे परिसरातील जिल्हा परिषदेच्या एका माजी पदाधिकाºयाची महत्त्वाची भूमिका असल्याची व त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातील एक शिक्षक महत्त्वाचा आशेचा ‘किरण’ ठरल्याचे बोलले जाते. या सर्व घडामोडीत ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ पातळीवर अधिकारी व एका वजनदार नेत्याकडेही अंगुलीनिर्देश करण्यात येत असल्याची चर्चा आहे.ग्रामविकास विभागातील काही वरिष्ठ अधिकाºयांना या बदल्यांमागील ‘गोम’ लक्षात आल्याने त्यांचा अशा प्रकारचे परिपत्रक काढण्यास विरोध होता; मात्र कसमादे परिसरातील या माजी पदाधिकाºयाने वजनदार नेत्याच्या मागे पाठपुरावा करून हे पत्रक काढून त्याचा सोयीचा अर्थ काढून लगोलग दोनशेहून अधिक शिक्षकांच्या बदल्यांची समुपदेशनाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला तत्पर केले; मात्र या सर्वांची बोंब झाल्यावर शिक्षक बदल्या इतक्या शांततेत कशा? यामागे काही तरी काळेबेरे असल्याचे सांगत स्थायी समितीतील सदस्यांनी या बदल्यांची कार्यवाही रद्द करावी, तसे बदल्यांचे आदेश काढू नयेत, यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवावे.मार्गदर्शन आल्यानंतर आपसी शिक्षक बदल्यांची कार्यवाही करावी, असा ठराव संमत केला आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.वेळेत कार्यवाही अशक्यया वर्षाच्या सुरुवातीलाच शासनाच्या सचिवांनी न्यायालयात शिक्षकांच्या आपसी बदल्यांबाबत वेळेत कार्यवाही करता येणे शक्य नसल्याचे लेखी दिले होते. तोच धागा पकडत न्यायालयाने शिक्षकांच्या नियमित बदल्या करण्यापूर्वी या आपसी शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले होते. तसेच ग्रामविकास विभागानेही तातडीने यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेला एक पत्र पाठवून आपसी शिक्षक बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते.