शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ग्रामीण भागात उष्णतेचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

दंडात्मक कारवाईकडेही दुर्लक्ष नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी त्याचा गर्दीवर परिणाम होत नसल्याचे दिसून येत ...

दंडात्मक कारवाईकडेही दुर्लक्ष

नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी त्याचा गर्दीवर परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसभर शहरातील विविध भागात गर्दी दिसुन येते. प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करुनही अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी वर्दळ दिसुन येते.

वीजपुरवठा खंडित केल्याने नाराजी

नाशिक : राज्य वीज वितरण कंपणीने ऐन उन्हाळ्यात थकबाकीपोटी काही शेतकऱ्यांचा पुरवठा खंडित केल्याने त्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज वितण कंपनीने थकबाकी भरण्यासाठी मुदत ठरवून द्यावी त्यानंतर कडक कारवाईचे धोरण अवलंबावे अशी मागणी करण्यात येत आहे.

खासगीकरणाच्या निर्णयामुळे नाराजी

नाशिक : केंद्र शासनाने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगीपेक्षा राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामीण भागाच्या विकासात अधिक योगदान दिले असल्याने या बँकांचे खासगीकरण करु नये अशी मागणी बॅंक कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

रुग्णवाहिकांच्या फेऱ्या वाढल्या

नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शहरातील ॲम्ब्युलन्सच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.दिवसभर शासकीय, खासगी आणि संस्था संघटनांच्या रुग्णवाहिका रुग्णांना सेवा पुरवत असल्याचे दिसुन येत आहे. रुग्णवाहिकांच्या दरातही काहीअंशी वाढ झाल्याने नागरिकांना भूर्दंड सहन करावा लागत आहे.

शहरातील रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील

नाशिक : कोविड रुग्ण संख्येमुळे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शासकीय अणि मनपा रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याने बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे. महापालिकेन त्यांच्या रुग्णालयात खाटांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मंगल कार्यालय व्यावसायिक अडचणीत

नाशिक : गत वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत असून यामुळे विवाह सोहळ्यांवर निर्बंध आल्याने लॉ्न्स , मंगल कार्यालय व्यावसायिक पूर्णपणे अडचणीत आले आहेत. ऐन लग्नसराईत या व्यावसायिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

बसफेऱ्या कमी असल्याने नाराजी

नाशिक: शहरातील बस फेऱ्यांची संख्या कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केली ैअसल्याने अनेकांना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. बसची संख्याही कमी असल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बस फेऱ्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

निर्णय घेतांना गरिबांचा विचार करावा

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून मोलमजुरी करणाऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला नवीन रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यात आता पुन्हा रुग्णसंख्य वाढल्याने शासन लॉकडाऊनचा विचार करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात असून हा निर्णय घेण्यापुर्वी गोरगरिबांचा विचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे.