शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात उष्णतेचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

दंडात्मक कारवाईकडेही दुर्लक्ष नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी त्याचा गर्दीवर परिणाम होत नसल्याचे दिसून येत ...

दंडात्मक कारवाईकडेही दुर्लक्ष

नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी त्याचा गर्दीवर परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसभर शहरातील विविध भागात गर्दी दिसुन येते. प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करुनही अनेक नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी वर्दळ दिसुन येते.

वीजपुरवठा खंडित केल्याने नाराजी

नाशिक : राज्य वीज वितरण कंपणीने ऐन उन्हाळ्यात थकबाकीपोटी काही शेतकऱ्यांचा पुरवठा खंडित केल्याने त्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज वितण कंपनीने थकबाकी भरण्यासाठी मुदत ठरवून द्यावी त्यानंतर कडक कारवाईचे धोरण अवलंबावे अशी मागणी करण्यात येत आहे.

खासगीकरणाच्या निर्णयामुळे नाराजी

नाशिक : केंद्र शासनाने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगीपेक्षा राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामीण भागाच्या विकासात अधिक योगदान दिले असल्याने या बँकांचे खासगीकरण करु नये अशी मागणी बॅंक कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

रुग्णवाहिकांच्या फेऱ्या वाढल्या

नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शहरातील ॲम्ब्युलन्सच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.दिवसभर शासकीय, खासगी आणि संस्था संघटनांच्या रुग्णवाहिका रुग्णांना सेवा पुरवत असल्याचे दिसुन येत आहे. रुग्णवाहिकांच्या दरातही काहीअंशी वाढ झाल्याने नागरिकांना भूर्दंड सहन करावा लागत आहे.

शहरातील रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील

नाशिक : कोविड रुग्ण संख्येमुळे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शासकीय अणि मनपा रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याने बेड उपलब्ध होणे कठीण झाले आहे. महापालिकेन त्यांच्या रुग्णालयात खाटांची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मंगल कार्यालय व्यावसायिक अडचणीत

नाशिक : गत वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत असून यामुळे विवाह सोहळ्यांवर निर्बंध आल्याने लॉ्न्स , मंगल कार्यालय व्यावसायिक पूर्णपणे अडचणीत आले आहेत. ऐन लग्नसराईत या व्यावसायिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

बसफेऱ्या कमी असल्याने नाराजी

नाशिक: शहरातील बस फेऱ्यांची संख्या कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केली ैअसल्याने अनेकांना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. बसची संख्याही कमी असल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बस फेऱ्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

निर्णय घेतांना गरिबांचा विचार करावा

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून मोलमजुरी करणाऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला नवीन रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यात आता पुन्हा रुग्णसंख्य वाढल्याने शासन लॉकडाऊनचा विचार करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात असून हा निर्णय घेण्यापुर्वी गोरगरिबांचा विचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे.