शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पर्यायी वृक्ष न लावल्यास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:02 IST

राज्याचे वनआच्छादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न वनविभागा कडून केले जात असताना वृक्षतोड ही मोठी समस्या कायम आहे. विकासकामांसाठी प्रसंगी वृक्षतोड करावी लागत असली तरी त्या बदल्यात वृक्ष लावण्याचे बंधनकारक असतानाही याबाबत फारसे गांभिर्याने पाहिले जात नसल्यामुळे आता यापुढे पर्यायी वृक्ष न लावणाऱ्यांवर दंडाबरोबरच शिक्षेचीदेखील तरतूद केली जाणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

नाशिक : राज्याचे वनआच्छादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न वनविभागा कडून केले जात असताना वृक्षतोड ही मोठी समस्या कायम आहे. विकासकामांसाठी प्रसंगी वृक्षतोड करावी लागत असली तरी त्या बदल्यात वृक्ष लावण्याचे बंधनकारक असतानाही याबाबत फारसे गांभिर्याने पाहिले जात नसल्यामुळे आता यापुढे पर्यायी वृक्ष न लावणाऱ्यांवर दंडाबरोबरच शिक्षेचीदेखील तरतूद केली जाणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृह येथे वनविभागाचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी घेतला. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडताना लोकसहभागातून वनआच्छादनाची चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. वन आणि झाडे वाचविणे ही सर्वांची जबाबदारी असून, सामाजिक भावनेतून ही चळवळ राबविली पाहिजे असे त्यांनी सांगितले.राज्याच्या विकासकामात अनेकदा रस्त्याच्या मध्ये येणारी वृक्ष तोडली जातात. परंतु अशाप्रकारची परवानगी देताना एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपे लावणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास दंडाची तरतूददेखील करण्यात आलेली आहे. मात्र या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष केंद्रित करणारी सक्षम यंत्रणा नसल्यामुळे तोडलेल्या झाडाच्या बदल्यात रोपे लावण्याच्या नियमाकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणारी एक समिती स्थापन करण्यात आली असून, दंडाबरोबरच शिक्षेची तरतूदही करण्यात येणार असल्याने या प्रकरणाला आळा बसू शकेल आणि वनांचे आच्छादन वाढण्यास मदत होईल, असाविश्वास मुनगंट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमात वनविभागा बरोबरच इतर ३५ शासकीय विभागांना या कार्यक्रमात सहभागी करवून घेतले असून, लोकसहभागातून ही चळवळ महाराष्टÑात राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. सदर कार्यक्रमासाठी माहिती तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी सांगितले. याप्रसंगी वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्यवनसंरक्षक उमेश अग्रवाल, प्रधान मुख्यवनसंरक्षक अनुराग चौधरी, व्यवस्थापकीय संचालक वनविकास महामंडळ डॉ. रामबाबू आदिंसह राज्यातील वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.वृक्षलागवडीसाठी १३२ कलमी कार्यक्रमवृक्षलागवडीसाठी मुनगंट्टीवार यांनी १३२ कलमी कार्यक्रम दिला असून, याचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. या १३२ कलमाचा भाग म्हणून ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. सदर कार्यक्रमांचा उद्देश वनांचे आच्छादन वाढविणे हा असून, सदर ३३ कोटी वृक्षलागवडीबाबत नियोजन व पूर्वतयारीचा भाग म्हणून दर चार महिन्यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते. यावेळी अधिकाºयांनी ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांचे योग्य नियोजन, पूर्व तयारी व कामांना गती देण्यासाठी आढावा सादर केला.

टॅग्स :forest departmentवनविभागSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार