शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

शिक्षणाची वारी सफल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:47 IST

मूल्याधारित, कृतियुक्त तसेच रोजगाराभिमुख शिक्षण हीच आजची खरी गरज आहे. त्यादृष्टीने जाणिवांची पेरणी करीत अध्यापनाची प्रेरणा जागविण्याचे काम ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमातून घडून आले आहे.

ठळक मुद्देप्रयोगांची व कृतिशील कार्याची माहितीतरच शिक्षणातील दर्जा राखता येईलपाठ्यपुस्तक मंडळातील लागेबांधेही उघड

मूल्याधारित, कृतियुक्त तसेच रोजगाराभिमुख शिक्षण हीच आजची खरी गरज आहे. त्यादृष्टीने जाणिवांची पेरणी करीत अध्यापनाची प्रेरणा जागविण्याचे काम ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमातून घडून आले आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणातर्फे संदीप फाउण्डेशन येथे आयोजित ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमात राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे स्टॉल्स लावून त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. दहा जिल्ह्यांमधील हजारो शिक्षकांनी या ‘वारी’त सहभागी होत शिक्षण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांची व कृतिशील कार्याची माहिती घेतली, त्यामुळे चांगले ‘मॉडेल’ काय वा कसे असते हे त्यांना या वारीतून अनुभवायला मिळाले. ‘वारी’तली अनुभवसिद्धताच तर पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारी असते. हा आध्यात्मिक वारीतलाच अनुभव शिक्षकांना ‘शिक्षणाच्या वारी’त आला. परिणामी एक वेगळीच संपन्नता घेऊन ते या वारीतून आपापल्या गावी परतले. त्याअर्थाने ही वारी सफल झाली असेच म्हणायला हवे. यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही सहभाग घेत शिक्षकांशी थेट संवाद साधला. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केलेल्या नाहीत, तर केवळ इमारती बंद करून संबंधित विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये स्थलांतरित केल्याचा खुलासा यावेळी तावडे यांनी करून यासंदर्भातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. अन्यही शासन निर्णयांची माहिती तावडे यांनी दिली; मात्र शिक्षक मान्यतेच्या प्रश्नासह सातवा वेतन आयोग व अनुदानाच्या विषयावर बोलण्याचे टाळले. त्यामुळे केवळ एकतर्फी अपेक्षा वा प्रयत्नांनी ‘वारी’ची साध्यता होणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित होऊन गेला आहे. शैक्षणिक सुविधांबाबत महाराष्ट्र देशात तिसºया स्थानावर आहे, असे शिक्षणमंत्री एकीकडे कौतुकाने सांगत असतानाच, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन करण्यासाठी लागू केलेल्या संगणकीय आॅनलाइन शालार्थ वेतनप्रणालीचे संकेतस्थळ तीन आठवड्यांपासून बंद पडलेले असल्याने शिक्षकांचे पगारच होऊ न शकल्याचे व त्यासाठी संघटनांना आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आलेले पहावयास मिळाले. एकीकडे त्र्यंबकेश्वराजवळ ‘शिक्षणाची वारी’ सुरू असताना तिकडे पुण्यातील शिक्षण हक्क परिषदेत शिक्षकांना देण्यात येणाºया अशैक्षणिक कामांबद्दल एल्गार पुकारण्यात आला. शिक्षकांच्या सुमारे शंभराहून अधिक संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. गेल्या साडेतीन वर्षांत शासनाने पाचशेपेक्षा अधिक शासन निर्णय काढून शिक्षकांवर विविध बंधने टाकल्याची बाब या परिषदेत पुढे आणली गेली व अशैक्षणिक कामांवर बहिष्काराचा निर्धार केला गेला. नेमके याच सुमारास दहावीचा नवीन अभ्यासक्रम पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने गाइडनिर्मिती करणाºयांचे पाठ्यपुस्तक मंडळातील लागेबांधेही उघड होऊन गेले. या प्रकरणी मुंबईतील दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण हक्क अंतर्गत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियाही अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. अन्यही अनेक बाबींची चर्चा येथे करता येऊ शकेल, ज्यातून शिक्षक व शिक्षणाप्रतीची शासनाची अनागोंदी उघड व्हावी. तेव्हा, एकीकडे दर्जेदार शिक्षणाच्या सोयी व सुविधांच्या गप्पा करताना शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकवर्गाच्या प्रश्नांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आयोग, पदोन्नती, अनुदान व अशैक्षणिक कामातून सुटका अशा सर्वच विषयांकडे हे लक्ष पुरविले गेले पाहिजे, तसे झाले तरच शिक्षणातील दर्जा राखता येईल व ‘शिक्षणाच्या वारी’तील शिक्षणमंत्र्यांच्या पाठ थोपटून घेण्याला अर्थ प्राप्त होऊ शकेल. ‘वारी’च्या सुफळ संपूर्णतेचा विचार करताना गोडी-गुलाबीच्या संवादापलीकडील समस्यांचे निराकरणही गरजेचे ठरावे ते म्हणूनच.