शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची वारी सफल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:47 IST

मूल्याधारित, कृतियुक्त तसेच रोजगाराभिमुख शिक्षण हीच आजची खरी गरज आहे. त्यादृष्टीने जाणिवांची पेरणी करीत अध्यापनाची प्रेरणा जागविण्याचे काम ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमातून घडून आले आहे.

ठळक मुद्देप्रयोगांची व कृतिशील कार्याची माहितीतरच शिक्षणातील दर्जा राखता येईलपाठ्यपुस्तक मंडळातील लागेबांधेही उघड

मूल्याधारित, कृतियुक्त तसेच रोजगाराभिमुख शिक्षण हीच आजची खरी गरज आहे. त्यादृष्टीने जाणिवांची पेरणी करीत अध्यापनाची प्रेरणा जागविण्याचे काम ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमातून घडून आले आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणातर्फे संदीप फाउण्डेशन येथे आयोजित ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमात राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे स्टॉल्स लावून त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. दहा जिल्ह्यांमधील हजारो शिक्षकांनी या ‘वारी’त सहभागी होत शिक्षण क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांची व कृतिशील कार्याची माहिती घेतली, त्यामुळे चांगले ‘मॉडेल’ काय वा कसे असते हे त्यांना या वारीतून अनुभवायला मिळाले. ‘वारी’तली अनुभवसिद्धताच तर पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारी असते. हा आध्यात्मिक वारीतलाच अनुभव शिक्षकांना ‘शिक्षणाच्या वारी’त आला. परिणामी एक वेगळीच संपन्नता घेऊन ते या वारीतून आपापल्या गावी परतले. त्याअर्थाने ही वारी सफल झाली असेच म्हणायला हवे. यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही सहभाग घेत शिक्षकांशी थेट संवाद साधला. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केलेल्या नाहीत, तर केवळ इमारती बंद करून संबंधित विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये स्थलांतरित केल्याचा खुलासा यावेळी तावडे यांनी करून यासंदर्भातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. अन्यही शासन निर्णयांची माहिती तावडे यांनी दिली; मात्र शिक्षक मान्यतेच्या प्रश्नासह सातवा वेतन आयोग व अनुदानाच्या विषयावर बोलण्याचे टाळले. त्यामुळे केवळ एकतर्फी अपेक्षा वा प्रयत्नांनी ‘वारी’ची साध्यता होणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित होऊन गेला आहे. शैक्षणिक सुविधांबाबत महाराष्ट्र देशात तिसºया स्थानावर आहे, असे शिक्षणमंत्री एकीकडे कौतुकाने सांगत असतानाच, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन करण्यासाठी लागू केलेल्या संगणकीय आॅनलाइन शालार्थ वेतनप्रणालीचे संकेतस्थळ तीन आठवड्यांपासून बंद पडलेले असल्याने शिक्षकांचे पगारच होऊ न शकल्याचे व त्यासाठी संघटनांना आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आलेले पहावयास मिळाले. एकीकडे त्र्यंबकेश्वराजवळ ‘शिक्षणाची वारी’ सुरू असताना तिकडे पुण्यातील शिक्षण हक्क परिषदेत शिक्षकांना देण्यात येणाºया अशैक्षणिक कामांबद्दल एल्गार पुकारण्यात आला. शिक्षकांच्या सुमारे शंभराहून अधिक संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. गेल्या साडेतीन वर्षांत शासनाने पाचशेपेक्षा अधिक शासन निर्णय काढून शिक्षकांवर विविध बंधने टाकल्याची बाब या परिषदेत पुढे आणली गेली व अशैक्षणिक कामांवर बहिष्काराचा निर्धार केला गेला. नेमके याच सुमारास दहावीचा नवीन अभ्यासक्रम पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने गाइडनिर्मिती करणाºयांचे पाठ्यपुस्तक मंडळातील लागेबांधेही उघड होऊन गेले. या प्रकरणी मुंबईतील दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण हक्क अंतर्गत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियाही अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. अन्यही अनेक बाबींची चर्चा येथे करता येऊ शकेल, ज्यातून शिक्षक व शिक्षणाप्रतीची शासनाची अनागोंदी उघड व्हावी. तेव्हा, एकीकडे दर्जेदार शिक्षणाच्या सोयी व सुविधांच्या गप्पा करताना शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकवर्गाच्या प्रश्नांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आयोग, पदोन्नती, अनुदान व अशैक्षणिक कामातून सुटका अशा सर्वच विषयांकडे हे लक्ष पुरविले गेले पाहिजे, तसे झाले तरच शिक्षणातील दर्जा राखता येईल व ‘शिक्षणाच्या वारी’तील शिक्षणमंत्र्यांच्या पाठ थोपटून घेण्याला अर्थ प्राप्त होऊ शकेल. ‘वारी’च्या सुफळ संपूर्णतेचा विचार करताना गोडी-गुलाबीच्या संवादापलीकडील समस्यांचे निराकरणही गरजेचे ठरावे ते म्हणूनच.