शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

खाद्यतेल कडाडले

By admin | Updated: August 19, 2016 00:52 IST

डाळी महागच : साखरेचे भाव चढे, भाज्यांचाही तोरा कायम

 नाशिक : सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा होत असताना ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत बुधवारी प्रति १५ लीटरच्या डब्यामागे ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत तेलाच्या किमतीत आतापर्यंत प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सणाच्या काळात स्वयंपाक घरातील गोडवाही कमी झाला आहे. गेल्यावर्षी ३० ते ३१ रुपये प्रतिकिलो असलेली साखर ४० रुपयांपर्यंत गेली आहे. डाळीच्या किमती घसरल्याचे बोलले जात असले तरी ग्राहकांना सव्वाशे रुपयांहून अधिक दराने तूरडाळ विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींसमोर घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक व विविध क्षेत्रातील कामगार आदिंसह सर्वसामान्य कुटुंबीयांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, तूरडाळ महागाईमुळे आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले आहे. त्यासाठी तूरडाळीचे वितरण स्वस्त धान्य दुकानांद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी अद्यापही ग्राहकांना सहजरीत्या स्वस्त डाळ उपलब्ध होऊ शकत नाही. तर घाऊक बाजारातही तूरडाळीचे भाव १० ते २० रुपयांनी घसरल्याची चर्चा रंगत असली तरी प्रत्यक्ष ग्राहकाला अजून १२५ ते ते १३० रुपये किलो डाळ विकत घ्यावी लागत आहे. अशा स्थितीत सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असल्याने नेमके स्वस्त काय झाले, असा सवाल गृहिणींनी केला आहे. स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींकडून वरणाऐवजी इतर पदार्थांच्या पर्यायाचा शोध सुरू आहे. मात्र बाजारातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दरही अजून चढेच असल्याने ठरलेल्या अंदाजपत्रकात घरखर्च चालविताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)