शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

खाद्यतेल कडाडले

By admin | Updated: August 19, 2016 00:52 IST

डाळी महागच : साखरेचे भाव चढे, भाज्यांचाही तोरा कायम

 नाशिक : सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा होत असताना ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत बुधवारी प्रति १५ लीटरच्या डब्यामागे ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत तेलाच्या किमतीत आतापर्यंत प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सणाच्या काळात स्वयंपाक घरातील गोडवाही कमी झाला आहे. गेल्यावर्षी ३० ते ३१ रुपये प्रतिकिलो असलेली साखर ४० रुपयांपर्यंत गेली आहे. डाळीच्या किमती घसरल्याचे बोलले जात असले तरी ग्राहकांना सव्वाशे रुपयांहून अधिक दराने तूरडाळ विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींसमोर घरखर्चाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक व विविध क्षेत्रातील कामगार आदिंसह सर्वसामान्य कुटुंबीयांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून डाळींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, तूरडाळ महागाईमुळे आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब झाले आहे. त्यासाठी तूरडाळीचे वितरण स्वस्त धान्य दुकानांद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी अद्यापही ग्राहकांना सहजरीत्या स्वस्त डाळ उपलब्ध होऊ शकत नाही. तर घाऊक बाजारातही तूरडाळीचे भाव १० ते २० रुपयांनी घसरल्याची चर्चा रंगत असली तरी प्रत्यक्ष ग्राहकाला अजून १२५ ते ते १३० रुपये किलो डाळ विकत घ्यावी लागत आहे. अशा स्थितीत सरकारकडून महागाई नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असल्याने नेमके स्वस्त काय झाले, असा सवाल गृहिणींनी केला आहे. स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींकडून वरणाऐवजी इतर पदार्थांच्या पर्यायाचा शोध सुरू आहे. मात्र बाजारातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दरही अजून चढेच असल्याने ठरलेल्या अंदाजपत्रकात घरखर्च चालविताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)