शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:12 IST

खामखेडा : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून शेतीमाल तयार झाल्यावर तो बाहेरील राज्यात नेण्यासाठी व्यापारी येतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

खामखेडा : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा खरीपाची पेरणी पूर्ण झाली असून शेतीमाल तयार झाल्यावर तो बाहेरील राज्यात नेण्यासाठी व्यापारी येतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी असायचे, तेव्हा या अल्पशा पाण्यावर मार्च किंवा एप्रिल महिन्यात उन्हाळी टमाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथींबीर आदी पिकांची लागवड केली जायची. तेव्हा ती पिके साधारण जून किंवा जुलैत बाजारात विक्रीसाठी तयार व्हायची व मालेगाव, नाशिक, धुळे, नवापूर, सुरत आदी ठिकाणी विक्रीसाठी नेली जायची.बांधावर येऊन माल खरेदी  बाहेरील व्यापारी थेट शेतकºयाचा बांधावर येऊन माल खरेदी करून रोख पैसे देऊन जायचे. त्या पैशातून शेतकºयाची मोठ्या प्रमाणात उलाढाल व्हायची व त्यातून शेतकरी खरीप हंगामातील पिकांसाठी बियाणे खत, मजुरी आदी भागवायचे.-----------------------याहीवर्षी परतीचा व अवकाळी पाऊस झाल्याने चालू वर्षी उन्हाळ्यात विहिरींना बºयापैकी पाणी होते. त्यामुळे खामखेडा परिसरातील शेतकºयांनी उन्हाळी मिरची, टमाटे, कोबी कोथींबीर आदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु दि. २२ मार्चपासून देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी टप्याटप्याने लॉकडाऊन करावे लागले.आता खरीप हंगामातील पिकाची पेरणी झाली आहे. पिकाची कोळपणी व निंदणीही झाली आहे. पिके जोमात आहेत. त्यांना खतखाद्याची आवश्यकता आहे. परंतु यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकºयाला टमाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर आदी माल बाहेरील बाजारपेठेत विक्रीसाठी नेता आला नाही किंवा बाहेरील व्यापारी माल खरेदीसाठी शेतकरयांच्या बांधावर आले नाहीत. यामुळे शेतीमाल शेतातच विक्रीअभावी पडून राहिल. स्थानिक बाजारपेठेत मालाची आवक वाढल्याने तो कवडीमोल भावाने विकावा लागला. त्यामुळे खर्चही वसूल न झाल्याने आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक