शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:18 IST

येवला तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांची कसरत : अपघातांमध्ये वाढ; तत्काळ दुरुस्तीची मागणी

येवला : शहरासह तालुक्यातील रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकांची वाहने खिळखिळी, तर चालकांची हाडे खिळखिळी होत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्ड्यांच्या ग्रहणातून येवलेकरांचे सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.निधी येणार आणि येवला शहरातील सगळे रस्ते होणार हेगेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या वतीने वारंवार सांगितले जात असले तरी रस्ते होत नाहीत. खड्डेदेखील बुजवले जात नाहीत. पालिकेत गल्ली ते दिल्ली सत्ता असताना शहराची परिस्थिती बदलण्याची अपेक्षा फोल ठरलेली दिसून येत आहे. जागोजागी मोठेमोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरातील गंगादरवाजा ते कोर्ट रस्ता, जुनी नगरपालिका थिएटररोड, मेनरोडची चाळण झाली आहे. पायी चालणेदेखील जिकरीचे झाले आहे. वाहन चालवताना अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांचे हाल थांबवावे, अशी मागणी होत आहेत.पालकमंत्र्यांच्या सूचनेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षयेवला मतदारसंघातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून, अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या रस्त्यांची तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. काही रस्त्यांची द्वैवार्षिक देखभाल दुरु स्ती करण्यासाठी निविदाप्रक्रि या सुरू असली तरी ही प्रक्रि या तातडीने अंतिम करून या रस्त्यांची दुरु स्ती हाती घेण्यात आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कामाचा देखावा; गुणवत्तेवर प्रश्नचिन्हरस्त्याची अधूनमधून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र,काम होताच महिनाभरातच उखडतो आणि पुन्हा खड्डेहोतात. पालिकेकडे जाणारा रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकदिसेनासे झाले आहेत व हीच अवस्था राणाप्रताप खुंटावरील रस्त्याची झाली आहे. त्यामुळे कामांचा केवळ देखावा केला जात असून, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर सत्ता आणि पदे मिळवण्याच्या गर्तेत असणारे नगरसेवक कर्तव्य पार पडणार की नाही? असा प्रश्न येवलेकरांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा