शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

भगर खा, फिट रहा !

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

नवा ट्रेण्ड : ‘गुणकारी’ पदार्थांच्या प्रचारासाठी मोहीम

संजय पाठक  नाशिकसामान्यत: उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडीला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या भगरीचा देशपातळीवर वापर केवळ दोन टक्के आहे, तोही मोजक्या राज्यात. त्या पार्श्वभूमीवर आता भगरीचा केवळ उपवास नव्हे तर पोषक अन्न म्हणून वापर करण्यासाठी भगर उत्पादक सरसावले असून, भगरीचे आरोग्यदायी गुणांचा प्रचार करीत ‘भगर खा, फिट रहा’ असा सल्ला दिला जात आहे.द्राक्ष, वाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वायनरी आहेत, परंतु त्याचबरोबर देशात सर्वाधिक भगर उत्पादक नाशिकमध्ये असून, त्याविषयी कोणाला फारशी माहिती नाही. नाशिक मुळातच आदिवासी जिल्हा असून, जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासीबहुल आहेत. साहजिक त्यांचे प्रमुख पीक असलेल्या वरईला फिनिशिंग करून भगर तयार केली जाते. नाशिकमध्ये ३५ भगर मिल असून, ९० टक्के भगर नाशिकमध्येच तयार होते. उपवासाला वापरली जाणारे हे जुने उत्पादन असले तरी जगन्नाथ-पुरीच्या यात्रेत प्रसाद म्हणून भगरीची खीर चाखणाऱ्या अनेकांना त्याचा उपवासात उपयोग होतो हे माहिती नाही. भगर म्हणजे वरईचा तांदूळ असा समज असल्याने दक्षिणेतील राज्यात भगर उपवसाला चालत नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान हे भगरीचा वापर करणारे प्रमुख राज्य त्या खालोखाल पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे भगर काही प्रमाणात वापरली जाते. अन्यत्र भगरीचा प्रचार-प्रसार झालेला नाही. आदिवासींना हक्काचे आर्थिक बळ देणाऱ्या भगरीचा उपवासाशीच संबंध जोडला जात असल्याने बहुधा भगरीपासून अन्य अनेक पदार्थ तयार करतात हे अनेकांना माहिती नाही. मात्र आता भगरीतील आरोग्यदायी गुण स्पष्ट करून त्याच्या प्रसारासाठी नाशिकची भगर असोसिएशन सरसावली आहे. भगर ग्लुटेनमुक्त असल्याने बेकरीच्या उत्पादनांसारखा ती अपायकारक नाही. तसेच त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह आणि लठ्ठपणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्यांना उपयुक्त ठरते, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. मुळात भगर ही केवळ उपवासासाठीच वापरली जाते हा गैरसमज आहे. साबुदाण्यापेक्षा कैकपटीने चांगले पदार्थ भगरीपासून तयार केले जातात. त्यात भगरीची इडली, लाह्या, उत्तपा, पॅटिस, ठेपले, ढोकळा, थालीपीठ, लाडू, खीर आणि शिरा असे अनेक पदार्थ तयार होतात. त्याचा आता देशभरात विविध माध्यमांतून प्रसार सुरू आहे, असे नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी सांगितले. ‘भगर खा, फिट’ रहा अशी चळवळ आता सुरू करण्यात आली असून, आहाराविषयी सजग असणाऱ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.