शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

इगतपुरीच्या पूर्व भागात अतिवृष्टीने शेती, घरांचे प्रचंड नुकसान

By admin | Updated: August 4, 2016 00:37 IST

संततधार सुरूच : साठवलेले कांदे, भातशेती, भाजीपाला पाण्यात; शेतकरी हवालदिल

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला अन् अनेक गावे पुराच्या पाण्यात वेढली गेली. पुराच्या तडाख्यात सापडलेले नागरिक सुखरूप आहेत; मात्र पावसाच्या थैमानाने काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली भातपिके डोळ्यादेखत वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले कांदेदेखील अतिवृष्टीच्या पुरात गडप झाले. पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता ते हवालदिल झाले आहेत. साकुर परिसरात अतिवृष्टीमुळे भाताचे तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच येथील सरपंच विष्णुपंत सहाणे यांच्या शेतातील जवळपास एक एकर ऊस जमीन अक्षरश: धुवून गेली आहे. नवीन लागवड केलेल्या एक एकर टमाटा पिकांचे मल्चिंग व ड्रिप पूर्ण पुरात वाहून गेले. जवळपास दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. येथील बऱ्हे यांच्या घरात पाणी शिरून घराची पडझड झाली आहे. घरातील सर्व धान्य व सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच शेतकऱ्यांचे बांध, पिके, घरांची पडझड झालेली आहे.अस्वली स्टेशनजवळील गोहाड मळ्यातील शेतकरी बाजीराव गोहाड यांनी गोठ्यात साठवून ठेवलेले जनावरांसाठी गवत पडवीसहित काल ओंडओहोळ नदीच्या पुरात वाहून गेले व भातपिकाचेदेखील नुकसान झाले. सुदाम काजळे यांच्या शेताचे बांध फुटून भाताच्या रोपांचे नुकसान झाले.साकुरफाटा भागातील पिंपळगाव डुकरा येथील शेतपिकांचे व चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच पिकांची झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. बाधित शेतकऱ्यांना कोसळलेली मने सावरणे आता कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप कर्ज काढून शेती पिकवली; मात्र निसर्गाच्या अवकृपेने त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे त्यांना कर्जफेड करणे कठीण आहे. पर्यायाने कर्ज देणाऱ्या संस्थाही अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाधितांचे अश्रू पुसण्याबरोबरच शासनाकडून मदत मिळवून देण्यास राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य देण्याची अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)