शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागात अतिवृष्टीने शेती, घरांचे प्रचंड नुकसान

By admin | Updated: August 4, 2016 00:37 IST

संततधार सुरूच : साठवलेले कांदे, भातशेती, भाजीपाला पाण्यात; शेतकरी हवालदिल

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला अन् अनेक गावे पुराच्या पाण्यात वेढली गेली. पुराच्या तडाख्यात सापडलेले नागरिक सुखरूप आहेत; मात्र पावसाच्या थैमानाने काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली भातपिके डोळ्यादेखत वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले कांदेदेखील अतिवृष्टीच्या पुरात गडप झाले. पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता ते हवालदिल झाले आहेत. साकुर परिसरात अतिवृष्टीमुळे भाताचे तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच येथील सरपंच विष्णुपंत सहाणे यांच्या शेतातील जवळपास एक एकर ऊस जमीन अक्षरश: धुवून गेली आहे. नवीन लागवड केलेल्या एक एकर टमाटा पिकांचे मल्चिंग व ड्रिप पूर्ण पुरात वाहून गेले. जवळपास दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. येथील बऱ्हे यांच्या घरात पाणी शिरून घराची पडझड झाली आहे. घरातील सर्व धान्य व सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच शेतकऱ्यांचे बांध, पिके, घरांची पडझड झालेली आहे.अस्वली स्टेशनजवळील गोहाड मळ्यातील शेतकरी बाजीराव गोहाड यांनी गोठ्यात साठवून ठेवलेले जनावरांसाठी गवत पडवीसहित काल ओंडओहोळ नदीच्या पुरात वाहून गेले व भातपिकाचेदेखील नुकसान झाले. सुदाम काजळे यांच्या शेताचे बांध फुटून भाताच्या रोपांचे नुकसान झाले.साकुरफाटा भागातील पिंपळगाव डुकरा येथील शेतपिकांचे व चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच पिकांची झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. बाधित शेतकऱ्यांना कोसळलेली मने सावरणे आता कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप कर्ज काढून शेती पिकवली; मात्र निसर्गाच्या अवकृपेने त्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे त्यांना कर्जफेड करणे कठीण आहे. पर्यायाने कर्ज देणाऱ्या संस्थाही अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाधितांचे अश्रू पुसण्याबरोबरच शासनाकडून मदत मिळवून देण्यास राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य देण्याची अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)