शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:40 IST

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : जिल्ह्यात बळीराजाची विविध कामांची लगबग

वेध शाळेपाठोपाठ निसर्गाच्या हालचालीवरून पाऊस जवळ आल्याचे संकेत मिळताच देशवंडीत सुताराच्या अंगणात शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग.

 

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.लग्नसमारंभाची धामधूम संपून उन्हाचीही तीव्रता काहीअंशी कमी होऊन हवेचे प्रमाण वाढले आहे. नायगाव खोºयात खरीपपूर्व मशागतींचे कामांची सध्या लगबग सुरू आहे. जून महिना सुरू झाला आहे. उशिरा का होईना वरुणराजाचे आगमन थोड्यााच दिवसात होणार असल्याचे भाकीत वेध शाळेबरोबर वातावरणातील बदलावरून दिसत आहे. शेतकºयांना सध्या खरीपाचे वेध लागले आहे. मशागतीचे कामे सुरू झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात नजरेस पडत आहे. सध्या लागवडीसाठी तयार झालेल्या जमिनीवर रोपवाटिका बनविण्यासाठी मेहनत सुरू आहे. यंदा पावसाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने यावर्षी शेतकरी कमी पाण्यावर व कमी खर्चात येणाºया पिकांची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार वाºयाने शेतकºयांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. जोराच्या हवेने पाऊस लवकर येईल किंवा लांबणीवर जाईल अशी दोन्ही भाकिते शेतकरी करत आहेत. त्यामुळे नक्की काय पदरात पडणार याबाबत शेतकºयांत संभ्रम आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प व शेवटच्या टप्प्यात झालेल्या कमी पावसामुळे यावर्षी प्रथमच नायगाव खोºयात तीव्र पाणीटंचाई भासली. परिसरातील विहिरी यावर्षी पहिल्यांदाच कोरड्या पडल्या आहेत.जून महिन्याच्या मध्यावर पाऊस होणार असल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठीचे बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग-मठ, उडीद आदींसह विविध बियाणे खरेदीसाठी तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगे आदी पिकांच्या रोपांची लागवडीसाठी नर्सरीत किंवा आपल्याच शेतात तयार करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.खरिपाच्या लगबगीने शेतशिवार गजबजून गेले असताना शेतीच्या मशागतीचे लाकडी नांगर, वखर, पांभर, जू आदी साहित्यांच्या डागडुजीसाठी खेडेगावातील सुतारांच्या न्याहावर शेतकºयांची गर्दी दिसू लागली आहे. गतवर्षी कमी का होईना पाऊस वेळवर सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मात्र अत्यल्प पाण्यावर पिकविलेल्या वर्षभर कोणत्याच भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. खरिपापाठोपाठ रब्बीच्या कांद्यानेही वांदा केला आहे.वातावरणातील उष्णता कमीसध्या हवामानातील बदल झपाट्याने घडत असल्याने वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. दिवसागणिक होणारे बदल पावसाचे स्पष्ट संकेत देत आहे. त्याच प्रमाणे कावळ्यांची घरटे बांधण्याची लगबग दिसत आहे. मुंग्याचीही अन्यधान्य साठवणीच्या कामाची लगबग नजरेस पडत आहे. यावरून यंदा वेधशाळेपाठोपाठ मिळत असलेले नैसर्गिक संकेत खरे ठरो आणि कष्टकरी बळीराजाला निदान पावसाचे तरी अच्छे दिन येवो.