शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:40 IST

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : जिल्ह्यात बळीराजाची विविध कामांची लगबग

वेध शाळेपाठोपाठ निसर्गाच्या हालचालीवरून पाऊस जवळ आल्याचे संकेत मिळताच देशवंडीत सुताराच्या अंगणात शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग.

 

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घेऊन आल्याने खरीपपूर्व मशागतीला सध्या शेत शिवारात सुरुवात झाली आहे.लग्नसमारंभाची धामधूम संपून उन्हाचीही तीव्रता काहीअंशी कमी होऊन हवेचे प्रमाण वाढले आहे. नायगाव खोºयात खरीपपूर्व मशागतींचे कामांची सध्या लगबग सुरू आहे. जून महिना सुरू झाला आहे. उशिरा का होईना वरुणराजाचे आगमन थोड्यााच दिवसात होणार असल्याचे भाकीत वेध शाळेबरोबर वातावरणातील बदलावरून दिसत आहे. शेतकºयांना सध्या खरीपाचे वेध लागले आहे. मशागतीचे कामे सुरू झाल्याचे चित्र सध्या शेत शिवारात नजरेस पडत आहे. सध्या लागवडीसाठी तयार झालेल्या जमिनीवर रोपवाटिका बनविण्यासाठी मेहनत सुरू आहे. यंदा पावसाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने यावर्षी शेतकरी कमी पाण्यावर व कमी खर्चात येणाºया पिकांची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार वाºयाने शेतकºयांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. जोराच्या हवेने पाऊस लवकर येईल किंवा लांबणीवर जाईल अशी दोन्ही भाकिते शेतकरी करत आहेत. त्यामुळे नक्की काय पदरात पडणार याबाबत शेतकºयांत संभ्रम आहे. गतवर्षी पडलेल्या अत्यल्प व शेवटच्या टप्प्यात झालेल्या कमी पावसामुळे यावर्षी प्रथमच नायगाव खोºयात तीव्र पाणीटंचाई भासली. परिसरातील विहिरी यावर्षी पहिल्यांदाच कोरड्या पडल्या आहेत.जून महिन्याच्या मध्यावर पाऊस होणार असल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठीचे बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग-मठ, उडीद आदींसह विविध बियाणे खरेदीसाठी तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगे आदी पिकांच्या रोपांची लागवडीसाठी नर्सरीत किंवा आपल्याच शेतात तयार करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.खरिपाच्या लगबगीने शेतशिवार गजबजून गेले असताना शेतीच्या मशागतीचे लाकडी नांगर, वखर, पांभर, जू आदी साहित्यांच्या डागडुजीसाठी खेडेगावातील सुतारांच्या न्याहावर शेतकºयांची गर्दी दिसू लागली आहे. गतवर्षी कमी का होईना पाऊस वेळवर सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मात्र अत्यल्प पाण्यावर पिकविलेल्या वर्षभर कोणत्याच भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. खरिपापाठोपाठ रब्बीच्या कांद्यानेही वांदा केला आहे.वातावरणातील उष्णता कमीसध्या हवामानातील बदल झपाट्याने घडत असल्याने वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. दिवसागणिक होणारे बदल पावसाचे स्पष्ट संकेत देत आहे. त्याच प्रमाणे कावळ्यांची घरटे बांधण्याची लगबग दिसत आहे. मुंग्याचीही अन्यधान्य साठवणीच्या कामाची लगबग नजरेस पडत आहे. यावरून यंदा वेधशाळेपाठोपाठ मिळत असलेले नैसर्गिक संकेत खरे ठरो आणि कष्टकरी बळीराजाला निदान पावसाचे तरी अच्छे दिन येवो.