शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

कोरोना रुग्ण नियंत्रणाची जबाबदारी प्रत्येक गावाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

येवला : ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही, ...

येवला : ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची असल्याची सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात येवला व निफाड तालुक्यांतील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर स्थिर झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही, ही चिंतेची बाब असून ही शून्य होणे अतिशय गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या शून्य झाली आहे, त्या ठिकाणी पुन्हा रुग्ण वाढणार नाही, यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच कोरोनाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गृहविलगीकरणातील रुग्णांच्या दररोज घरी जाऊन तपासणी करण्यात येऊन त्यांना घरी राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात यावे. जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी केल्या.

इन्फो

आर्थिक मदतीचे वाटप

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अपघातात निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागामार्फत २० लाभार्थींना प्रत्येकी रुपये २० हजारांच्या मानधनाचे वाटप भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दुबार पेरणीचे संकट लक्षात घेता पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचेही आवाहन भुजबळ यांनी केले.

फोटो- ०२ येवला भुजबळ

येवला येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ.

020721\02nsk_35_02072021_13.jpg

फोटो- ०२ येवला भुजबळ येवला येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ.