शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामपंचायती निवडणुकांचा आजपासून उडणार धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:51 IST

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बुधवारपासून (दि.२३) उडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप विरोध बळकट करत एकत्रित लढण्याचा निर्धार केला असल्याने नेत्यांचीही त्या दृष्टीने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देनामनिर्देशनपत्र होणार दाखल : गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बुधवारपासून (दि.२३) उडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप विरोध बळकट करत एकत्रित लढण्याचा निर्धार केला असल्याने नेत्यांचीही त्या दृष्टीने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची मुदत संपून त्यावर सध्या प्रशासक नियुक्त आहे. कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार, दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुक उमेदवारांना दि. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. मात्र, शासकीय सुटीच्या दिवशी म्हणजे दि. २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार असून, ४ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी वैध उमेदवारांना चिन्हवाटप केले जाणार आहे. दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, दि. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.इन्फो२५ सप्टेंबरच्या मतदार याद्या ग्राह्यविधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.नेत्यांची प्रतिष्ठा पणालाग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक स्तरावर गट-तटामध्ये लढल्या जात असल्याने या ठिकाणी राजकीय पक्षांना फारसा वाव नसतो. तरीही जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपनेही ग्रामीण भागात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असला तरी गावपातळीवर मात्र पॅनलनिर्मितीला वेग आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.या तालुक्यात होणार निवडणुकानाशिक - २५त्र्यंबकेश्वर - ०३दिंडोरी - ६०इगतपुरी - ०८निफाड - ६५सिन्नर - १००येवला - ६९मालेगाव - ९९नांदगाव - ५९चांदवड - ५३कळवण - २९बागलाण - ४०देवळा - ११एकूण - ६२१

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक