शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

ग्रामपंचायती निवडणुकांचा आजपासून उडणार धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:51 IST

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बुधवारपासून (दि.२३) उडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप विरोध बळकट करत एकत्रित लढण्याचा निर्धार केला असल्याने नेत्यांचीही त्या दृष्टीने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देनामनिर्देशनपत्र होणार दाखल : गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बुधवारपासून (दि.२३) उडणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पॅनलनिर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप विरोध बळकट करत एकत्रित लढण्याचा निर्धार केला असल्याने नेत्यांचीही त्या दृष्टीने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची मुदत संपून त्यावर सध्या प्रशासक नियुक्त आहे. कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार, दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुक उमेदवारांना दि. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. मात्र, शासकीय सुटीच्या दिवशी म्हणजे दि. २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होणार असून, ४ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी वैध उमेदवारांना चिन्हवाटप केले जाणार आहे. दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, दि. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.इन्फो२५ सप्टेंबरच्या मतदार याद्या ग्राह्यविधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.नेत्यांची प्रतिष्ठा पणालाग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक स्तरावर गट-तटामध्ये लढल्या जात असल्याने या ठिकाणी राजकीय पक्षांना फारसा वाव नसतो. तरीही जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपनेही ग्रामीण भागात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असला तरी गावपातळीवर मात्र पॅनलनिर्मितीला वेग आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.या तालुक्यात होणार निवडणुकानाशिक - २५त्र्यंबकेश्वर - ०३दिंडोरी - ६०इगतपुरी - ०८निफाड - ६५सिन्नर - १००येवला - ६९मालेगाव - ९९नांदगाव - ५९चांदवड - ५३कळवण - २९बागलाण - ४०देवळा - ११एकूण - ६२१

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक