शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटेपासून दुरंतो थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 18:04 IST

इगतपुरी :मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी आहे.काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देरद्द केलेल्या गाड्या : - राज्यराणी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, या गाड्या रद्द करण्यात आल्या असून गेल्या 27 तारखेपासून पुणे भुसावळ एक्सप्रेस ही गाडी मनमाड वाया वळवण्यात आली आहे. तर चाकरमान्यांची लाईफ लाईन समजली जाणारी पंचवटी एक्सप्रे

इगतपुरी :मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने याचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला असुन अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी आहे.काल मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली आहे.  इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजेपासून दीड हजार प्रवाशी असलेल्या दुरंतो एक्सप्रेस उभी असून त्याचबरोबर सकाळी साडेसहाला येणारी येणारी मंगला एक्स्प्रेस आज इगतपुरी रेल्वे स्थानकात आठ वाजता दरम्यान आली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर रेल्वे प्रशासनाकडुन प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा करण्यात आलेली नाही. दुरांतो एक्सप्रेस मध्ये लहान मुले व महीला मोठया प्रमाणात असुनरेल्वे प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची खानपानची व्यवस्था केली नसल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली .याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारणा केली असता, आम्ही सर्व सोयी पुरविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रवाशांपर्यंत कोणतीच सुविधा अथवा खानपानची व्यवस्था न पोहचल्याने रेल्वे प्रवाशांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.मात्र १०ते१२ तास पासुन रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या प्रवाशांना एक सामाजिक बांधिलकी म्हणुन शहरातील नगरसेवक दिनेश कोळेकर व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर तसेच डॉक्टर प्रदीप बागल यांनी प्रवाशांसाठी दुरतो एक्सप्रेस च्या प्रवाशांना चहा ,पाणी , नाष्टा, अल्पउपहार ,जेवणाची सुविधा ,तसेच कुणी प्रवाशी आजारी असल्यास डॉ प्रदीप बागल यांनी वैद्यकीय तपासणी करु न प्रवाशांना प्राथमिक उपचार करण्यात आले यावेळी त्यांचे प्रवाशांनी आभार व्यक्त केले.तर पुढे कधी जाणार याची काळजी प्रवाशांना पडली आहे.तसेच सकाळी आठ वाजता आलेली मंगला एक्सप्रेस दुपारी एक वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकात रद्द् करून पुन्हा मनमाड ,दौंड सोलापुर मार्गी रेणुगुंटा , एरणा कुरलम जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या मुळे प्रवासी वर्गात मोठी नाराजी पसरली होती मात्र पावसाअभावी हा निर्णय घेण्यात आला आह.े अशी रेल्वे प्रशासना सांगितले.दुरतो एक्सप्रेस मध्ये जवळ पास एक ते दीड हजार प्रवासी होते .दुरंतो एक्सप्रेस मधील काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकातून बाहेर येऊन खाजगी वाहनांनी प्रवास केलातर रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की पाऊस कमी झाल्यास रेल्वे पुन्हा पूर्वपदावर येईल.