शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

By admin | Updated: December 5, 2015 23:55 IST

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याने महापालिका आणि पालकमंत्री यांच्यातील वादाचे पडसाद उमटत आहेत. महापालिकेने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घोषित झाल्यानंतरही अद्याप प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदर पाणीकपात रद्द करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्याने प्रशासनही चिमटीत सापडले आहे. त्यामुळे आठवड्यातील एक वार निश्चित करण्यासही विलंब होत आहे. गंगापूर व दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात करण्यात आल्याने महापालिकेने जुलै २०१६ अखेर उपलब्ध पाणीसाठा पुरेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महापौर अशोक मुर्तडक यांनी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, भाजपाने सदर निर्णयास विरोध दर्शवित एकवेळ पाणीकपातच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तातडीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना महापालिकेला केली. तसे पत्रही लगोलग प्रशासनाला पाठविले. मात्र, महापौरांनी पालकमंत्र्यांनाच आव्हान देत वाढीव पाणीकपातीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. या साऱ्या वादात प्रशासन मात्र कोंडीत सापडले आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाला सहा दिवस उलटून गेले तरी महापौरांकडून अद्याप पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणाऱ्या वाराची निश्चिती झालेली नाही. परिणामी, डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा तसाच गेला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेमुळे प्रशासनही अंमलबजावणीत वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांचा ठिय्या : हरणबारीतून पाणी सोडण्याची मागणीनाशिक : हरणबारी धरण शंभर टक्के भरून ओव्हरप्फ्लो झाल्याने धरणातून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडण्यात येणारे नियमित आवर्तन पिण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी काल (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हरणबारीतून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. मात्र धरण शंभर टक्के भरलेले असल्याने १५ डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे सोडण्यात येणारे नियमित आवर्तन यावर्षीही सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली.