शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

By admin | Updated: December 5, 2015 23:55 IST

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याने महापालिका आणि पालकमंत्री यांच्यातील वादाचे पडसाद उमटत आहेत. महापालिकेने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घोषित झाल्यानंतरही अद्याप प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदर पाणीकपात रद्द करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्याने प्रशासनही चिमटीत सापडले आहे. त्यामुळे आठवड्यातील एक वार निश्चित करण्यासही विलंब होत आहे. गंगापूर व दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात करण्यात आल्याने महापालिकेने जुलै २०१६ अखेर उपलब्ध पाणीसाठा पुरेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महापौर अशोक मुर्तडक यांनी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, भाजपाने सदर निर्णयास विरोध दर्शवित एकवेळ पाणीकपातच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तातडीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना महापालिकेला केली. तसे पत्रही लगोलग प्रशासनाला पाठविले. मात्र, महापौरांनी पालकमंत्र्यांनाच आव्हान देत वाढीव पाणीकपातीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. या साऱ्या वादात प्रशासन मात्र कोंडीत सापडले आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाला सहा दिवस उलटून गेले तरी महापौरांकडून अद्याप पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणाऱ्या वाराची निश्चिती झालेली नाही. परिणामी, डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा तसाच गेला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेमुळे प्रशासनही अंमलबजावणीत वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांचा ठिय्या : हरणबारीतून पाणी सोडण्याची मागणीनाशिक : हरणबारी धरण शंभर टक्के भरून ओव्हरप्फ्लो झाल्याने धरणातून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडण्यात येणारे नियमित आवर्तन पिण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी काल (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हरणबारीतून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. मात्र धरण शंभर टक्के भरलेले असल्याने १५ डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे सोडण्यात येणारे नियमित आवर्तन यावर्षीही सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली.