शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

By admin | Updated: December 5, 2015 23:55 IST

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याने महापालिका आणि पालकमंत्री यांच्यातील वादाचे पडसाद उमटत आहेत. महापालिकेने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घोषित झाल्यानंतरही अद्याप प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदर पाणीकपात रद्द करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्याने प्रशासनही चिमटीत सापडले आहे. त्यामुळे आठवड्यातील एक वार निश्चित करण्यासही विलंब होत आहे. गंगापूर व दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात करण्यात आल्याने महापालिकेने जुलै २०१६ अखेर उपलब्ध पाणीसाठा पुरेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महापौर अशोक मुर्तडक यांनी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, भाजपाने सदर निर्णयास विरोध दर्शवित एकवेळ पाणीकपातच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तातडीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना महापालिकेला केली. तसे पत्रही लगोलग प्रशासनाला पाठविले. मात्र, महापौरांनी पालकमंत्र्यांनाच आव्हान देत वाढीव पाणीकपातीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. या साऱ्या वादात प्रशासन मात्र कोंडीत सापडले आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाला सहा दिवस उलटून गेले तरी महापौरांकडून अद्याप पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणाऱ्या वाराची निश्चिती झालेली नाही. परिणामी, डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा तसाच गेला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेमुळे प्रशासनही अंमलबजावणीत वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांचा ठिय्या : हरणबारीतून पाणी सोडण्याची मागणीनाशिक : हरणबारी धरण शंभर टक्के भरून ओव्हरप्फ्लो झाल्याने धरणातून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडण्यात येणारे नियमित आवर्तन पिण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी काल (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हरणबारीतून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. मात्र धरण शंभर टक्के भरलेले असल्याने १५ डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे सोडण्यात येणारे नियमित आवर्तन यावर्षीही सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली.