शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

दहावी, बारावीच्या शिक्षकांना दिलासा?

By admin | Updated: February 12, 2017 00:21 IST

आयोगाचे संदिग्ध आदेश : शिक्षक संभ्रमात

नाशिक : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखीपरीक्षा महिनाअखेर म्हणजेच जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीनंतर असली तरी, सध्या या विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेतल्या जात आहेत. अशा परिस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामात वगळण्यासाठी केल्या जाणाऱ्या मागणीवर राज्य निवडणूक आयोगाने संदिग्ध आदेश काढल्याने शिक्षक आणखीच संभ्रमात सापडले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाते. त्यात विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल, प्रोजेक्ट सादर करणेही बंधनकारक असते. आंतरशालेय वा महाविद्यालयीन परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणपत्रकात समाविष्ट केले जातात. सध्या गेल्या आठवड्यापासून शिक्षक याच कामात गुंतलेले आहेत. तथापि, सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेची निवडणूक तयारी सुरू असून, मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची निकड भासत असल्याने सर्व शिक्षकांची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. या शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षणही दिले जात असल्यामुळे दहावी, बारावीच्या शिक्षकांची हेळसांड होऊ लागली आहे. प्रशिक्षणाला दांडी मारल्यास कारणे दाखवा नोटिसा व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असून, शाळेकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत शिक्षक संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता, त्याची दखल घेत आयोगाने सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिकांचे आयुक्तांना पत्र पाठवून परीक्षेच्या कामासाठी कमीत कमी आवश्यक असलेल्या शिक्षकांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा शक्य असल्यास विचार करावा, असे त्यात म्हटले आहे.