शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

पाणीटंचाई होणार दूर

By admin | Updated: February 17, 2016 22:41 IST

देवळा : चणकापूरमधून सोडलेले पाणी रामेश्वर धरणापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान

 संजय देवरे देवळाचणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिल्यामुळे देवळा शहरातील पाणीटंचाई दूर होणार असून, तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनापुढे मात्र चणकापूर धरणातून कालव्याला सोडलेले पाणी सुरक्षितपणे रामेश्वर धरणापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान उभे आहे.गतवर्षी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यामुळे सर्व धरणे, पाझर तलाव कोरडे पडले होते. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने वार्शी, कनकापूर, शेरी, धोडी ही तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणे भरली. रामेश्वर धरणही काही प्रमाणात भरले. चणकापूर उजव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पूरपाण्याने रामेश्वर धरण भरले व या भागाला दिलासा मिळाला असला, तरी तालुक्याचा पूर्व भाग मात्र पाण्यापासून वंचित राहिला असून, सध्या या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना टॅँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गिरणा नदीला सोडलेले आवर्तन बंद झाल्यामुळे गिरणा नदी कोरडी पडली असून, या पाण्यावर अवलंबून असलेली नऊ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. यामुळे देवळा शहराला अनियमित पाणीपुरवठा होत असून, शहरातील उपनगरांमध्ये कमी दाबामुळे पाणी पोहोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन जेव्हा सोडले जाईल तेव्हाच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. परंतु यासाठी अद्याप दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंत शहराला पाणीपुरवठा करावयाचा तरी कोठून, असा प्रश्न देवळा नगरपंचायत प्रशासनापुढे पडला होता. परंतु आता चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर ह्या कालव्यांतर्गत येणाऱ्या पोटचारीला पाणी सोडून सटवाईवाडी येथील डोण शिवारातील धरण भरण्यात येणार आहे. यामुळे येथील उद्भव विहिरीतील पाणी सटवाईवाडी येथील जलकुंभात टाकून देवळा शहरासह नऊ गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत होणार असल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. वरवंडी, मटाणे, वाजगाव या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या या गावांना कालव्याला पाणी आल्यानंतर दिलासा मिळणार आहे. वाजगाव येथे कोलती नदीत कालव्याचे पाणी पडते. तेथे केटी वेअर आहे. हा केटीवेअर भरल्यानंतर वाजगावला पाणीपुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरीला पाणी उतरते व गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होतो. हे केटीवेअर भरल्यानंतर येथून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. रामेश्वर धरणातील पाण्यावर पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही, यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार असून, असे प्रकार करणाऱ्यावंर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत म्हणजे ह्या प्रकारांना आळा बसेल. परंतु पाटबंधारे विभागाला पोलीस, वीज वितरणचे सहकार्य मिळाले तर पाणीचोरी थांबवता येईल. (वार्ताहर)