शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई होणार दूर

By admin | Updated: February 17, 2016 22:41 IST

देवळा : चणकापूरमधून सोडलेले पाणी रामेश्वर धरणापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान

 संजय देवरे देवळाचणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिल्यामुळे देवळा शहरातील पाणीटंचाई दूर होणार असून, तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनापुढे मात्र चणकापूर धरणातून कालव्याला सोडलेले पाणी सुरक्षितपणे रामेश्वर धरणापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान उभे आहे.गतवर्षी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. यामुळे सर्व धरणे, पाझर तलाव कोरडे पडले होते. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने वार्शी, कनकापूर, शेरी, धोडी ही तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणे भरली. रामेश्वर धरणही काही प्रमाणात भरले. चणकापूर उजव्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पूरपाण्याने रामेश्वर धरण भरले व या भागाला दिलासा मिळाला असला, तरी तालुक्याचा पूर्व भाग मात्र पाण्यापासून वंचित राहिला असून, सध्या या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना टॅँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गिरणा नदीला सोडलेले आवर्तन बंद झाल्यामुळे गिरणा नदी कोरडी पडली असून, या पाण्यावर अवलंबून असलेली नऊ गाव पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. यामुळे देवळा शहराला अनियमित पाणीपुरवठा होत असून, शहरातील उपनगरांमध्ये कमी दाबामुळे पाणी पोहोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन जेव्हा सोडले जाईल तेव्हाच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. परंतु यासाठी अद्याप दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंत शहराला पाणीपुरवठा करावयाचा तरी कोठून, असा प्रश्न देवळा नगरपंचायत प्रशासनापुढे पडला होता. परंतु आता चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर ह्या कालव्यांतर्गत येणाऱ्या पोटचारीला पाणी सोडून सटवाईवाडी येथील डोण शिवारातील धरण भरण्यात येणार आहे. यामुळे येथील उद्भव विहिरीतील पाणी सटवाईवाडी येथील जलकुंभात टाकून देवळा शहरासह नऊ गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत होणार असल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. वरवंडी, मटाणे, वाजगाव या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या या गावांना कालव्याला पाणी आल्यानंतर दिलासा मिळणार आहे. वाजगाव येथे कोलती नदीत कालव्याचे पाणी पडते. तेथे केटी वेअर आहे. हा केटीवेअर भरल्यानंतर वाजगावला पाणीपुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरीला पाणी उतरते व गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होतो. हे केटीवेअर भरल्यानंतर येथून अनधिकृत पाणी उपसा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. रामेश्वर धरणातील पाण्यावर पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही, यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार असून, असे प्रकार करणाऱ्यावंर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत म्हणजे ह्या प्रकारांना आळा बसेल. परंतु पाटबंधारे विभागाला पोलीस, वीज वितरणचे सहकार्य मिळाले तर पाणीचोरी थांबवता येईल. (वार्ताहर)