शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळापूर्व नालासफाई न केल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:44 IST

येवला : यंदा पावसाळा वेळेवर व चांगला सुरु झाला असून गेल्या चार दिवसापासून येवला शहरात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे येवला शहरातील मोठे मोठे नाले पालिकेची पावसाळापूर्व नाला सफाई झाली नसल्याने नाला व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच गटारी व नाल्यामधील कचरा व प्लास्टिक रस्त्यावर येत असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत.

ठळक मुद्देयेवला पालिकेने दुर्लक्ष्य : सर्वत्र दुर्गंधी सुटली; शहरवासीयांची स्वच्छतेची मागणी

येवला : यंदा पावसाळा वेळेवर व चांगला सुरु झाला असून गेल्या चार दिवसापासून येवला शहरात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे येवला शहरातील मोठे मोठे नाले पालिकेची पावसाळापूर्व नाला सफाई झाली नसल्याने नाला व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच गटारी व नाल्यामधील कचरा व प्लास्टिक रस्त्यावर येत असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत.थेट शनीपटांगण भागातून येणारा मोठा नाला, आणि हुडको वसाहतीजवळचा नाला, यासह कधीही न वाहिलेल्या मोठ्या गटारी, यांची सफाई होण्याची गरज आहे. केवळ दोन नाले आणि चार गटारी स्वच्छ करून शहरवासियांचे समाधान होणार नाही. शहरात अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संपूर्ण गावातील छोट्या मोठ्या गटारी पुन्हा एकदा स्वच्छ व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहेच.स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकारण करणाºया नगरसेवकांनी ही मोहीम आपआपल्या प्रभागात राबवण्यास सक्र ीय सहभाग घ्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. स्वच्छता मोहीम अनेकदा राबवली जाते. पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरते. स्वच्छता मोहीम ही व्यापक जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा आहे.येवला शहरातील शनिमंदिराजवळील नाला, हुडको परिसरात असणारा नाला, यासह काही छोटेमोठे नाले सध्या गाळाने व प्लास्टिकच्या कचर्याने भरले आहेत. शहरातील अनेक भागात अस्वछतेने कळस गाठला आहे. चौक तेथे घाण अशी अवस्था आहे. नाल्यासह गटारीतून कचरा आण िप्लास्टिक साचल्याने पाणी तुंबून राहते. पाणी साठते व परिसरात मोठी दुर्गंधी येत आहे. शिवाय परिसरातील रिहवाशी केरकचरा आणून टाकत असल्याने या कचर्याची प्रचंड दुर्गंधी पसरते.घाणीचे साम्राज्य पसरलेल्या मार्गावरून ये-जा करणाºयाना नाक दाबूनच मार्गक्र मण करावे लागते. यामुळे परिसरात संतापाची भावना तीव्र झाली आहे. परिसरातील नागरीक या घाणीमुळे त्रस्त झाले आहेत. पालिका या बाबत आता तरी लक्ष घालील काय ? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.गंगादरवाजा भागासह फत्तेबुरुज नाका परिसरातील सर्व गटारी फुटलेल्या आहेत. कमालीची घाण साचली आहे. त्यामुळे पाऊस पडला कि या भागातील गटारी तुडुंब भरून वाहतात व भरलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. फत्तेबुरु ज नाका कॉर्नरला तर कमालीची दुर्गंधी पसरली आहे.शहरातील नामांकित एन्झोकेम विद्यालय व स्वामी मुक्तानंदविद्यालय व महाविद्यालय, याच परिसरात आहे. गंगादरवाजा आणि हुडको रस्त्यावरून १७ जून पासून मोठी वर्दळ सुरु होईल. सर्वांना नाक बंद करूनच या परिसरातून जावे लागते. नगरपालिकेने या भागातही स्वच्छता अभियानाचा झाडू पुन्हा एकदा फिरवावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून नेहमीच होत असते. अनेक ठिकाणी घाणीचे खच उघड्यावर टाकण्यापेक्षा नगरपालिकेने एकही कचरा कुंडीची व्यवस्था करावी.तसेच शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावरून जात असताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नाला सफाईसह शहरातील स्वच्छता रस्त्याचे खड्डे असे अनेक विषय डोके वर काढत असून नगरपालिकेने तत्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा शहरात आहे. कॉलनी भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. आता पाऊस पडल्यावर कसरत करीत घरात जावे लागते. सगळीकडे चिखल होण्याचा अनुभव नित्याचा आहे. शहरातील राणाप्रताप खुंटासह काहीभागात झालेले निकृष्ठ दर्जाचे रस्ते उखडले आहेत.शिवाय म्हसोबानगर सह कॉलनी भागातील सांडपाणी अंगणगाव लगत असणाºया नदीपात्रालगत सोडले गेल्याने प्रवाहित नसणाºया या नाल्यातून मोठी दुर्गधी येथे या परिसरातून नाक बंद करून जावे लागते. समस्येवर उपाययोजनेची गरज गरज आहे. येवला-विंचूर चौफुलीवर ट्राफिक जाम होण्याचा नित्याचा अनुभव आहे.येथे ट्राफिक सिग्नलची अनेक दिवसांची मागणी आहे. परंतु पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे कॉलनीवासियांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.