शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

पावसाळापूर्व नालासफाई न केल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:44 IST

येवला : यंदा पावसाळा वेळेवर व चांगला सुरु झाला असून गेल्या चार दिवसापासून येवला शहरात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे येवला शहरातील मोठे मोठे नाले पालिकेची पावसाळापूर्व नाला सफाई झाली नसल्याने नाला व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच गटारी व नाल्यामधील कचरा व प्लास्टिक रस्त्यावर येत असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत.

ठळक मुद्देयेवला पालिकेने दुर्लक्ष्य : सर्वत्र दुर्गंधी सुटली; शहरवासीयांची स्वच्छतेची मागणी

येवला : यंदा पावसाळा वेळेवर व चांगला सुरु झाला असून गेल्या चार दिवसापासून येवला शहरात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे येवला शहरातील मोठे मोठे नाले पालिकेची पावसाळापूर्व नाला सफाई झाली नसल्याने नाला व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. या गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. तसेच गटारी व नाल्यामधील कचरा व प्लास्टिक रस्त्यावर येत असल्याने शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात मोठे दोन नाले यासह कधीही प्रवाहित न झालेल्या मोठ्या गटारी आहेत.थेट शनीपटांगण भागातून येणारा मोठा नाला, आणि हुडको वसाहतीजवळचा नाला, यासह कधीही न वाहिलेल्या मोठ्या गटारी, यांची सफाई होण्याची गरज आहे. केवळ दोन नाले आणि चार गटारी स्वच्छ करून शहरवासियांचे समाधान होणार नाही. शहरात अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संपूर्ण गावातील छोट्या मोठ्या गटारी पुन्हा एकदा स्वच्छ व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहेच.स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकारण करणाºया नगरसेवकांनी ही मोहीम आपआपल्या प्रभागात राबवण्यास सक्र ीय सहभाग घ्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. स्वच्छता मोहीम अनेकदा राबवली जाते. पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरते. स्वच्छता मोहीम ही व्यापक जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा आहे.येवला शहरातील शनिमंदिराजवळील नाला, हुडको परिसरात असणारा नाला, यासह काही छोटेमोठे नाले सध्या गाळाने व प्लास्टिकच्या कचर्याने भरले आहेत. शहरातील अनेक भागात अस्वछतेने कळस गाठला आहे. चौक तेथे घाण अशी अवस्था आहे. नाल्यासह गटारीतून कचरा आण िप्लास्टिक साचल्याने पाणी तुंबून राहते. पाणी साठते व परिसरात मोठी दुर्गंधी येत आहे. शिवाय परिसरातील रिहवाशी केरकचरा आणून टाकत असल्याने या कचर्याची प्रचंड दुर्गंधी पसरते.घाणीचे साम्राज्य पसरलेल्या मार्गावरून ये-जा करणाºयाना नाक दाबूनच मार्गक्र मण करावे लागते. यामुळे परिसरात संतापाची भावना तीव्र झाली आहे. परिसरातील नागरीक या घाणीमुळे त्रस्त झाले आहेत. पालिका या बाबत आता तरी लक्ष घालील काय ? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.गंगादरवाजा भागासह फत्तेबुरुज नाका परिसरातील सर्व गटारी फुटलेल्या आहेत. कमालीची घाण साचली आहे. त्यामुळे पाऊस पडला कि या भागातील गटारी तुडुंब भरून वाहतात व भरलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. फत्तेबुरु ज नाका कॉर्नरला तर कमालीची दुर्गंधी पसरली आहे.शहरातील नामांकित एन्झोकेम विद्यालय व स्वामी मुक्तानंदविद्यालय व महाविद्यालय, याच परिसरात आहे. गंगादरवाजा आणि हुडको रस्त्यावरून १७ जून पासून मोठी वर्दळ सुरु होईल. सर्वांना नाक बंद करूनच या परिसरातून जावे लागते. नगरपालिकेने या भागातही स्वच्छता अभियानाचा झाडू पुन्हा एकदा फिरवावा अशी मागणी परिसरातील नागरिकाकडून नेहमीच होत असते. अनेक ठिकाणी घाणीचे खच उघड्यावर टाकण्यापेक्षा नगरपालिकेने एकही कचरा कुंडीची व्यवस्था करावी.तसेच शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावरून जात असताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नाला सफाईसह शहरातील स्वच्छता रस्त्याचे खड्डे असे अनेक विषय डोके वर काढत असून नगरपालिकेने तत्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा शहरात आहे. कॉलनी भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. आता पाऊस पडल्यावर कसरत करीत घरात जावे लागते. सगळीकडे चिखल होण्याचा अनुभव नित्याचा आहे. शहरातील राणाप्रताप खुंटासह काहीभागात झालेले निकृष्ठ दर्जाचे रस्ते उखडले आहेत.शिवाय म्हसोबानगर सह कॉलनी भागातील सांडपाणी अंगणगाव लगत असणाºया नदीपात्रालगत सोडले गेल्याने प्रवाहित नसणाºया या नाल्यातून मोठी दुर्गधी येथे या परिसरातून नाक बंद करून जावे लागते. समस्येवर उपाययोजनेची गरज गरज आहे. येवला-विंचूर चौफुलीवर ट्राफिक जाम होण्याचा नित्याचा अनुभव आहे.येथे ट्राफिक सिग्नलची अनेक दिवसांची मागणी आहे. परंतु पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे कॉलनीवासियांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.