शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पावसामुळे खालशांनी बस्तान गुंडाळले

By admin | Updated: September 19, 2015 22:55 IST

पावसामुळे खालशांनी बस्तान गुंडाळले

तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे साधुग्राममधील खालशांनी शनिवारी बस्तान गुंडाळण्यास सुरवात केली. २५ सप्टेंबरपर्यंत बहुतांश खालशे थांबण्याच्या तयारीत होते. मात्र शुक्रवारी पाऊस सारखा बरसल्याने खालशातील साधू, भक्तांना रात्रभर जागून काढावी लागली. पाऊस सतत सुरू राहिल्यास मुक्कामासाठी हाल होणार म्हणून खालशांनी मंडपासह सामान आवरण्यास सुरुवात केली आहे. साधुग्राममध्ये प्रशासनाने तिन्ही अनी आखाड्यांत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्याची व्यवस्था केली. मात्र खालशांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी चाऱ्या काढून कुठलीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नाही. महिनाभर पाऊस फारसा पडला नाही. त्यामुळे खालशांना अडचणी झाल्या नाहीत; परंतु दुसऱ्या पर्वणीच्या पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या पर्वणी काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खालशांमध्ये पाणी साचले. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पर्वणीला साधू व भक्तगणांना खालशांच्या मंडपात रात्रभर जागून राहावे लागले. खालशांच्या मंडपात पाणी साचल्याने मुक्कामाचा प्रश्न निर्माण झाल्याने साधूंसह भक्तगणांनी परतीला सुरुवात केली आहे.