शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की

By admin | Updated: March 18, 2016 23:57 IST

योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की

नाशिक : योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक ताणतणावांना दूर ठेवून, योग्य जीवनशैलीने दिनचर्या ठेवली तर सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या आजारांना सहजतेने दूर ठेवता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ संगीता पत्की यांनी केले. हुतात्मा स्मारक येथे समाज परिवर्तन केंद्राच्या वतीने आयोजित केशव भारती स्मृती व्याख्यानाअंतर्गत ‘आहार व शरीरस्वास्थ’ या विषयावर त्या बोलत होत्या. पत्की पुढे म्हणाल्या की, ताणतणावांना आपल्या आयुष्यात किती आणि कसे महत्त्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. आजारांमध्ये त्याची परिणती व्हायला नको याची खबरदारी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीतील चौरस आहाराचे महत्त्व अधोरेखित करताना पत्की म्हणाल्या की, शरीराला आपले कार्य करण्यासाठी ज्या घटकांची गरज असते ते सारे चौरस आहाराच्या परिपाकातूनच मिळतात. यावेळी बापू उपाध्ये स्मृती जलजागृती निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास गोविंद माळी, सुधा माळी, वसंतराव हुदलीकर, कुमार औरंगाबादकर, सुधा माळी, सुषमा देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. अभिजीत रणधीर याने प्रथम क्रमांक मिळवला. अक्षदा भंडारे याने द्वितीय, तर अनुराधा तावरे तृतीय आली. रेणुका जाधव, सुनीता शिंदे, भूषण रिपोटे, अर्जुन बेजेकर, दीपक शहाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.