शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की

By admin | Updated: March 18, 2016 23:57 IST

योग्य जीवनशैलीमुळे आजार नियंत्रणात : पत्की

नाशिक : योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक ताणतणावांना दूर ठेवून, योग्य जीवनशैलीने दिनचर्या ठेवली तर सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या आजारांना सहजतेने दूर ठेवता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ संगीता पत्की यांनी केले. हुतात्मा स्मारक येथे समाज परिवर्तन केंद्राच्या वतीने आयोजित केशव भारती स्मृती व्याख्यानाअंतर्गत ‘आहार व शरीरस्वास्थ’ या विषयावर त्या बोलत होत्या. पत्की पुढे म्हणाल्या की, ताणतणावांना आपल्या आयुष्यात किती आणि कसे महत्त्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. आजारांमध्ये त्याची परिणती व्हायला नको याची खबरदारी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीतील चौरस आहाराचे महत्त्व अधोरेखित करताना पत्की म्हणाल्या की, शरीराला आपले कार्य करण्यासाठी ज्या घटकांची गरज असते ते सारे चौरस आहाराच्या परिपाकातूनच मिळतात. यावेळी बापू उपाध्ये स्मृती जलजागृती निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास गोविंद माळी, सुधा माळी, वसंतराव हुदलीकर, कुमार औरंगाबादकर, सुधा माळी, सुषमा देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेतील विजेत्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. अभिजीत रणधीर याने प्रथम क्रमांक मिळवला. अक्षदा भंडारे याने द्वितीय, तर अनुराधा तावरे तृतीय आली. रेणुका जाधव, सुनीता शिंदे, भूषण रिपोटे, अर्जुन बेजेकर, दीपक शहाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.