शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

नायगाव खोऱ्यात पाण्याअभावी लाल कांद्याचे पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:37 IST

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात विहीरींनी तळ गाठल्याने शेकडो एकर लाल कांद्या बरोबर विविध पिके करपू लागली आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सध्या बोअरवेलच्या माध्यमातून शेती व्यवसाय टिकविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांवर दुष्काळात तेरावा महिना अनुभवण्याची वेळ आली आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात विहीरींनी तळ गाठल्याने शेकडो एकर लाल कांद्या बरोबर विविध पिके करपू लागली आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी सध्या बोअरवेलच्या माध्यमातून शेती व्यवसाय टिकविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे.नायगाव परिसराबरोबरच तालुक्यातील सर्वच विहिरींनी नोव्हेंबरच्या मध्यावरच तळ गाठला आहे. सध्या पाण्याअभावी दिवसागणिक शेतातील उभे पीक सोडून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. परिसरात दररोज एक ते दोन एकर क्षेत्रातील पीके पाण्याअभावी सोडले जात असल्याची विदारक परिस्थती बघावयास मिळत आहे.यंदा भरपूर पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर भरोसा ठेऊन शेतकºयांनी खरीपाच्या पेरणी व लागवडीची तयारी केली होती. खरीपाच्या पिकांनी शेत -शिवार हिरवेगार होण्यापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र सर्वच पीक काढणीला येण्याआधी शेतातच करपून गेली होती. नोव्हेंबर महिण्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. हजारो रूपये खर्चुनही शेकडो एकर लाल कांद्याबरोबरच विविध पिकेही अपुºया पाण्यामुळे सोडण्याची वेळ आल्याने शेतकºयांवर दुष्काळात तेरावा महिना अनुभवण्याची वेळ आली आहे.आडातच नाही तर......संपूर्ण पावसाळ्यात एकदाही नदी - नाले पावसाच्या पाण्याने वाहीले नसल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शेतात लागवड केलेले पिके वाचविण्याची भोळी अशा व येणाºया काळात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था होईल या दोन्ही कारणाने परिसरात अनेक शेतकरी बोरवेल मशिनच्या सहाय्याने कुपनलीका खोदुन आपले नशीब आजमावत आहे. मात्र अत्यल्प पडलेल्या पावसामुळे जमिनीतच पाणी नसल्याने कुपनलीका खोदण्यासाठी फुटांवर पैसे मोजणारे शेतकरी सध्या खेळत असलेला पाण्याचा जुगार जुगारच ठरत आहे.गव्हाचे उत्पादन घटणारआत्ता पर्यंत पाण्याअभावी खरिपाची पुरती वाताहत झाली आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगाम घेण्याची आशा धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे रब्बीतील गव्हाचे क्षेत्र नायगाव परिसरात मोठया प्रमाणात घटणार असल्याने यंदा शेतकºयांवरही धान्य विकत घेण्याची वेळ येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.कमी पाण्यात जास्तीतजास्त क्षेत्र ओलीताखाली येण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्यामुळे नायगाव परिसरात अनेक शेतकºयांनी ठिबक सिंचनचा वापर करून टोमॅटो, कोबी, मिरची अशी अनेक पिकांची मल्चींग पेपरवर लागवड केली. मात्र आत्ताच विहिरींनी तळ गाठण्यास सुरवात केल्याने महागडा खर्च करून ठिबक सिंचनवर लागवड केलेली पीकही हातची वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.फोटो क्र. : 18२्रल्लस्रँ06, 18२्रल्लस्रँ07 फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील तुकाराम गिते यांच्या शेतातील लाल कांद्याचे पिक पाण्याअभावी करपून गेले आहे. तर दुसºया छायाचित्रात ज्ञानेश्वर दिघोळे यांच्या शेतात ठिबक सिंचनवर लावलेले टोमॅटोचे पीकही करपून गेले.