शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

साठवणीची सोय नसल्याने टंचाई

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत. दि. ३ मार्चपर्यंत त्र्यंबक पंचायत समितीकडे सोमनाथनगर मेटघर किल्ल्याचे प्रस्ताव दाखल झाले होते. सोमवारी जवळपास ८ ते १० प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मूलवड गंगाद्वारची मेट ही गावे वाड्यापाडे आदि भागातील लोक तर समक्षच आले होते. त्यावेळेस मावळत्या पदाधिकाऱ्यांची शेवटची बैठक (दि. ३ मार्च) संपन्न झाली. गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांना सांगितले. यावेळी मेटघरचे ग्रामसेवक यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्र्यंबक पंचायत समितीने पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आता पंचायत समिती उपाययोजना करून टँकर वगैरेंचे प्रस्ताव पाठवू शकेल. टंचाई आराखडा तीन टप्प्यांत केलेला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर- पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च- दुसरा टप्पा व शेवटचा टप्पा एप्रिल ते जून. पहिल्या टप्प्यात सहसा टंचाई भासत नाही. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून, टंचाई प्रस्ताव येण्यास सुरु वात झाली आहे. या प्रस्तावांची दखल गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तातडीने तहसील कार्यालयाकडे पाठविले जातील. दरम्यान, टंचाई आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देवगावच्या ढोलेवाडी, लचके वाडी, खरशेतचे पांगूळघर, जांभूळपाडा, सारवण, कसोली, मुरु महट्टी, शेंद्रीपाडा, सादडपाडा, मूलवडचा करंजपाणा, चौरापाडा, वळण सावरपाडा, होलदारनगरचा बोरपाडा, झारवड खुर्दची डगळेवाडी, चिंचवडचा बोरीपाडा, भानसमेट, बोडिंगपाडा, मेटघर किल्ला, गंगाद्वार, विनायक खिंड, महादरवाजाची मेट, सुपलीची मेट, जांबाची वाडी, पठारवाडी या गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)