शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

साठवणीची सोय नसल्याने टंचाई

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत. दि. ३ मार्चपर्यंत त्र्यंबक पंचायत समितीकडे सोमनाथनगर मेटघर किल्ल्याचे प्रस्ताव दाखल झाले होते. सोमवारी जवळपास ८ ते १० प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मूलवड गंगाद्वारची मेट ही गावे वाड्यापाडे आदि भागातील लोक तर समक्षच आले होते. त्यावेळेस मावळत्या पदाधिकाऱ्यांची शेवटची बैठक (दि. ३ मार्च) संपन्न झाली. गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांना सांगितले. यावेळी मेटघरचे ग्रामसेवक यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्र्यंबक पंचायत समितीने पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आता पंचायत समिती उपाययोजना करून टँकर वगैरेंचे प्रस्ताव पाठवू शकेल. टंचाई आराखडा तीन टप्प्यांत केलेला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर- पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च- दुसरा टप्पा व शेवटचा टप्पा एप्रिल ते जून. पहिल्या टप्प्यात सहसा टंचाई भासत नाही. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून, टंचाई प्रस्ताव येण्यास सुरु वात झाली आहे. या प्रस्तावांची दखल गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तातडीने तहसील कार्यालयाकडे पाठविले जातील. दरम्यान, टंचाई आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देवगावच्या ढोलेवाडी, लचके वाडी, खरशेतचे पांगूळघर, जांभूळपाडा, सारवण, कसोली, मुरु महट्टी, शेंद्रीपाडा, सादडपाडा, मूलवडचा करंजपाणा, चौरापाडा, वळण सावरपाडा, होलदारनगरचा बोरपाडा, झारवड खुर्दची डगळेवाडी, चिंचवडचा बोरीपाडा, भानसमेट, बोडिंगपाडा, मेटघर किल्ला, गंगाद्वार, विनायक खिंड, महादरवाजाची मेट, सुपलीची मेट, जांबाची वाडी, पठारवाडी या गावांचा समावेश आहे. (वार्ताहर)