शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

दर नसल्याने सिमला मिरची शेतातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:17 IST

ब्राह्मणगाव : सध्या सिमला मिरची, टमाटा, कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, येथील ...

ब्राह्मणगाव : सध्या सिमला मिरची, टमाटा, कोबीला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, येथील राकेश बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या शेतात तीन एकरमध्ये लावलेली सिमला मिरची तशीच सोडून द्यावी लागल्याने त्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जाधव यांनी त्यांच्या तीन एकर क्षेत्रात मोठा खर्च करून सिमला मिरचीचे उत्पादन घेतले. पण मिरचीला फक्त चार पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने मिरचीची रोप लावणी, त्याची वाढ झाल्यावर बांधणी, फवारणी, काढणीचा खर्च ही निघत नसल्याने तयार सिमला मिरचीचे पीक तसेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे आतापर्यंत लाखोंचे नुकसान झाले आहे. पुन्हा शेतातील उभे पीक काढण्यासाठी त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. सध्या परिसरात कोबीसह टमाट्याचीही लागवड मोठ्या प्रमाणात आाहे. कोबी, टमाटा यांनाही दर नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोबीवर करपा रोगाने अडचण निर्माण केली असून फवारणीसाठी खर्च होतच आहे. त्यात दर नसल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

--------------------

ब्राह्मणगाव येथील शेतकरी राकेश जाधव शेतातील सिमला मिरचीचे तयार पीक दाखवताना. (२३ ब्राह्मणगाव १)

230821\23nsk_10_23082021_13.jpg

२३ ब्राह्मणगाव १