शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:42 IST

येवला : येवला तालुक्याकडे पावसाने सपशेल पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस न झाल्याने   चिंतेत वाढ झाली आहे. विहीरी व कुपनलीका कोरड्या पडल्याने आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतू पाण्याअभावी बहुतांशी पिके हातची गेली आहेत. त्यामुळे आधिच विविध संकटात असलेला शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने धास्तावला आहे.

येवला : येवला तालुक्याकडे पावसाने सपशेल पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस न झाल्याने  चिंतेत वाढ झाली आहे. विहीरी व कुपनलीका कोरड्या पडल्याने आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतू पाण्याअभावी बहुतांशी पिके हातची गेली आहेत. त्यामुळे आधिच विविध संकटात असलेला शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने धास्तावला आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चारवेळा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजाने खरीप पिकांसाठी पेरणीपूर्व मशागत आटोपली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. तो आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने विजेच्या वादळी वाºयासह हजेरी लावली होती. ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने एक ते दोन दिवस वीज प्रवाह खंडित झाला होता. बऱ्याच ठिकाणी झाडे रस्त्यात कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर काही ठिकाणी घराचे छप्पर उडाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. परंतू गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे.