शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पाऊस नसल्याने जिल्ह्यातील एस. टी. बसचा मार्ग सुरळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:19 IST

नाशिक : गाव खेड्यापर्यंत पोहोचलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचा मार्ग यंदा पावसाळ्यातही सुरळीत सुरू आहे. अनेकदा ...

नाशिक : गाव खेड्यापर्यंत पोहोचलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचा मार्ग यंदा पावसाळ्यातही सुरळीत सुरू आहे. अनेकदा पुलावरून वाहणारे पाणी, भराव वाहून गेल्याने खचलेला रस्ता तसेच गावांचा तुटलेला संपर्क यामुळे बसेसचा मार्ग बंद होतो. परंतु यंदा जिल्ह्यात सप्टेबरमध्येही पाऊस नसल्याने गावापर्यंत बसेस पोहोचत असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे. तसेही यंदा पूर्ण क्षमतेने आणि गावखेड्यापर्यंत बसेस सुरू नसल्याने तालुक्याच्या गावापर्यंत बसेस सुरळीत पोहोचत आहेत.

जिल्ह्यात सध्या ५४६ बसेस सुरू असून, यामध्ये वाढदेखील होत आहे. जिल्ह्यातील १३ आगारांमधून बसेसचे नियोजन केले जात आहे. तालुका पातळीपर्यंत सुरू असलेल्या बसेस विनाअडथळा सुरू असल्याचे नाशिक विभागीय महामंडळाच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात शक्यतो निफाड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटतो. तसेच येथील पुलावरून अवजड वाहतूक बंद केली जाते. तेव्हा प्रवासी वाहतूक थांबविली जाते किंवा इतर कोणत्याही रस्ते अथवा पुलावरून वाहतूक बंद होते तेव्हाच एस. टी. बसेस थांबतात. यंदा तशी परिस्थिती उद्भवलेली नाही.

--इन्फो--

जिल्ह्यातील आगार आणि सुरू असलेल्या बसेसची संख्या

नाशिक-१: ९४

नाशिक-२: ४२

मालेगाव: ४२

मनमाड: ३३

सटाणा: ५३

सिन्नर: ४७

नांदगाव: ३५

इगतपुरी: २७

लासलगाव: ३४

कळवण: ४७

पेठ: २७

येवला: ३३

पिंपळगाव: ३२

--इन्फो--

लांब पल्ल्याच्या बसेस सुरळीत सुरू

राज्यातील अनेक भागात पाऊस असल्याने काही भागातील बसेस थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे अडकून पडलेल्या बसेस पोहोचू शकलेल्या नाहीत. मागील महिन्यात रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आता बसेस सुरळीत सुरू झालेल्या आहेत. जिल्हांतर्गत बसेस नियमतपणे धावत आहेत.

--इन्फो--

पावसामुळे फेऱ्या रद्द करण्याची आली वेळ

नांदगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथून सुटणाऱ्या गाड्या सकाळच्या सुमारास सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाशिकला होणाऱ्या फेऱ्या बंद करण्याची वेळ आली. याशिवाय आगारातही पाणी साठल्याने अनेक बसेस थांबवाव्या लागल्या. जातेगाव, साकोरे मार्गावरील फरशी पूल तसेच भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. इतर ठिकाणी मात्र बसेस सुरळीत सुरू करण्यात आल्या. दुपारनंतर नांदगाव तसेच मालेगाव आगारातून बसेस नियमित सुरू करण्यात आल्या.