शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाऊस नसल्याने जिल्ह्यातील एस. टी. बसचा मार्ग सुरळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:19 IST

नाशिक : गाव खेड्यापर्यंत पोहोचलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचा मार्ग यंदा पावसाळ्यातही सुरळीत सुरू आहे. अनेकदा ...

नाशिक : गाव खेड्यापर्यंत पोहोचलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचा मार्ग यंदा पावसाळ्यातही सुरळीत सुरू आहे. अनेकदा पुलावरून वाहणारे पाणी, भराव वाहून गेल्याने खचलेला रस्ता तसेच गावांचा तुटलेला संपर्क यामुळे बसेसचा मार्ग बंद होतो. परंतु यंदा जिल्ह्यात सप्टेबरमध्येही पाऊस नसल्याने गावापर्यंत बसेस पोहोचत असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे. तसेही यंदा पूर्ण क्षमतेने आणि गावखेड्यापर्यंत बसेस सुरू नसल्याने तालुक्याच्या गावापर्यंत बसेस सुरळीत पोहोचत आहेत.

जिल्ह्यात सध्या ५४६ बसेस सुरू असून, यामध्ये वाढदेखील होत आहे. जिल्ह्यातील १३ आगारांमधून बसेसचे नियोजन केले जात आहे. तालुका पातळीपर्यंत सुरू असलेल्या बसेस विनाअडथळा सुरू असल्याचे नाशिक विभागीय महामंडळाच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात शक्यतो निफाड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटतो. तसेच येथील पुलावरून अवजड वाहतूक बंद केली जाते. तेव्हा प्रवासी वाहतूक थांबविली जाते किंवा इतर कोणत्याही रस्ते अथवा पुलावरून वाहतूक बंद होते तेव्हाच एस. टी. बसेस थांबतात. यंदा तशी परिस्थिती उद्भवलेली नाही.

--इन्फो--

जिल्ह्यातील आगार आणि सुरू असलेल्या बसेसची संख्या

नाशिक-१: ९४

नाशिक-२: ४२

मालेगाव: ४२

मनमाड: ३३

सटाणा: ५३

सिन्नर: ४७

नांदगाव: ३५

इगतपुरी: २७

लासलगाव: ३४

कळवण: ४७

पेठ: २७

येवला: ३३

पिंपळगाव: ३२

--इन्फो--

लांब पल्ल्याच्या बसेस सुरळीत सुरू

राज्यातील अनेक भागात पाऊस असल्याने काही भागातील बसेस थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे अडकून पडलेल्या बसेस पोहोचू शकलेल्या नाहीत. मागील महिन्यात रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आता बसेस सुरळीत सुरू झालेल्या आहेत. जिल्हांतर्गत बसेस नियमतपणे धावत आहेत.

--इन्फो--

पावसामुळे फेऱ्या रद्द करण्याची आली वेळ

नांदगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथून सुटणाऱ्या गाड्या सकाळच्या सुमारास सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाशिकला होणाऱ्या फेऱ्या बंद करण्याची वेळ आली. याशिवाय आगारातही पाणी साठल्याने अनेक बसेस थांबवाव्या लागल्या. जातेगाव, साकोरे मार्गावरील फरशी पूल तसेच भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. इतर ठिकाणी मात्र बसेस सुरळीत सुरू करण्यात आल्या. दुपारनंतर नांदगाव तसेच मालेगाव आगारातून बसेस नियमित सुरू करण्यात आल्या.