शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी येथून रात्री नाशिकसाठी बस नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:09 IST

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देशिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात बस नसल्याने परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सिन्नर किंवा कोपरगाव आगाराने रात्री ८ ते १० च्या दरम्यान साध्या बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. शिर्डी येथून वावी, पांगरी, सिन्नर, नाशिक, मुंबई येथे जाणाºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे; परंतु संध्याकाळची ६ वाजून ४५ मिनिटांची सिन्नर आगाराची शिर्डी-नाशिक साधी बस गेल्यानंतर एकही बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. साईभक्त व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. सध्या रात्री ८ वाजता परळ आगाराची हिरकणी शिर्डी-दादर निमआराम, रात्री ९ वाजता कोपरगाव आगाराची शिर्डी-दादर निमआराम बस आहे. तथापि, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिककडे येण्यासाठी एकही साधी बस नाही. शिवाय रात्री ९ नंतर साधी किंवा निमआराम बस नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.सध्या कोपरगाव आगारातर्फे नाशिकसाठी एक किंवा दोन तासाला बस सुरू आहे. त्याऐवजी शिर्डीवरून सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एक साधी बस सुरू करण्यासह रात्री ९ वाजेनंतर नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सिन्नर आगाराने रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.शिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही ही मोठी खेदजनक बाब आहे. रात्री नऊनंतर नाशिकसाठी बस चालू केल्यास आगाराच्या उत्पन्न वाढीबरोबर प्रवाशांची गैरसोयसुद्धा दूर होईल. सिन्नर किंवा कोपरगाव आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन रात्रीची बस सुरू करावी, अशी मागणी संजय पांगारकर, युनुस कादरी, सर्जेराव कलकत्ते, संदीप पगार, सर्जेराव पगार आदींसह प्रवाशांनी केली आहे.गर्दीचा हंगाम असल्यास शिर्डी येथून नाशिक जाण्यासाठी जादा बस सोडल्या जातात. तथापि, हंगाम संपल्यानंतर बससेवा बंद केली जाते. त्यामुळे नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. शिर्डी बसस्थानकातून नाशिकला जाण्यासाठी रात्री ८ वाजेनंतर बसफेºया वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.