शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

शिर्डी येथून रात्री नाशिकसाठी बस नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:09 IST

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देशिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही

पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात बस नसल्याने परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सिन्नर किंवा कोपरगाव आगाराने रात्री ८ ते १० च्या दरम्यान साध्या बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. शिर्डी येथून वावी, पांगरी, सिन्नर, नाशिक, मुंबई येथे जाणाºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे; परंतु संध्याकाळची ६ वाजून ४५ मिनिटांची सिन्नर आगाराची शिर्डी-नाशिक साधी बस गेल्यानंतर एकही बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. साईभक्त व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. सध्या रात्री ८ वाजता परळ आगाराची हिरकणी शिर्डी-दादर निमआराम, रात्री ९ वाजता कोपरगाव आगाराची शिर्डी-दादर निमआराम बस आहे. तथापि, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिककडे येण्यासाठी एकही साधी बस नाही. शिवाय रात्री ९ नंतर साधी किंवा निमआराम बस नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.सध्या कोपरगाव आगारातर्फे नाशिकसाठी एक किंवा दोन तासाला बस सुरू आहे. त्याऐवजी शिर्डीवरून सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एक साधी बस सुरू करण्यासह रात्री ९ वाजेनंतर नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सिन्नर आगाराने रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.शिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही ही मोठी खेदजनक बाब आहे. रात्री नऊनंतर नाशिकसाठी बस चालू केल्यास आगाराच्या उत्पन्न वाढीबरोबर प्रवाशांची गैरसोयसुद्धा दूर होईल. सिन्नर किंवा कोपरगाव आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन रात्रीची बस सुरू करावी, अशी मागणी संजय पांगारकर, युनुस कादरी, सर्जेराव कलकत्ते, संदीप पगार, सर्जेराव पगार आदींसह प्रवाशांनी केली आहे.गर्दीचा हंगाम असल्यास शिर्डी येथून नाशिक जाण्यासाठी जादा बस सोडल्या जातात. तथापि, हंगाम संपल्यानंतर बससेवा बंद केली जाते. त्यामुळे नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. शिर्डी बसस्थानकातून नाशिकला जाण्यासाठी रात्री ८ वाजेनंतर बसफेºया वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.