शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कणकापूर-मुलूखवाडी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: November 26, 2015 23:47 IST

कणकापूर-मुलूखवाडी रस्त्याची दुरवस्था

देवळा : तालुक्यातील कणकापूर-मुलूखवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख नंदू जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या कणकापूर-शेरी-मुलूखवाडी या अडीच किमी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्याची खडी वर आल्याने वाहन चालवणे दुरापास्त झाले आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्यादेखील खचल्या आहेत. वार्शी, मुलूखवाडी, हनुमंतपाडा, शेरी आदि गावातील शेतकरी आपला शेतमाल पिंपळगाव (ब) येथील बाजारात नेण्यासाठी कांचनबारीतून वडाळीमार्गे जातात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर, पिकअप आदि वाहने नादुरुस्त होतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वेळेवर मार्केटमध्ये पोहोचविण्यास उशीर होऊन त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. परिवहन महामंडळाच्या दोन बस याच रस्त्याने प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या परिसरातील दुचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)