शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘जलयुक्त’मुळे ढेकू शिवार झाले जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:48 IST

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकू गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे.

ठळक मुद्देनांदगाव : क्षमतेत २०५ टीएमसीने वाढ

नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकू गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे.नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रूक आणि ढेकू खुर्द अशा दोन्ही गावांत पाणीटंचाई असल्याने उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. विहिरीची पाणीपातळी जानेवारीनंतर खालवत असल्याने त्यानंतर पिके घेणे कठीण होत असे. परंतु ‘जलयुक्त शिवार’ योजनेत गावाची निवड झाली आणि या गावाचे रूपच पालटले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही गावांत विविध यंत्रणांमार्फत २८ कामे पूर्ण करण्यात आली. यावर १९ लाख रु पये खर्च करण्यात आला. गाळ काढण्याच्या कामात लोकसहभागही चांगला मिळाला. एकूण दोनशे हेक्टर क्षेत्रावर कामे घेण्यात आली. ढेकू बुद्रूक गावाची पाण्याची एकूण गरज ३३३ टीसीएम असताना पाणीसाठा २२४ टीसीएम होता. नव्या कामांमुळे २०५ टीसीएम अतिरिक्त पाणीक्षमता निर्माण झाल्याने पाऊस चांगला आल्यास रब्बीच्या पिकांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार आहे. ढेकू खुर्द गावात पाण्याची गरज ४२० टीसीएम असताना जलयुक्तच्या कामांमुळे एकूण ४२८ टीसीएम पाणीक्षमता निर्माण झाली आहे. दोन्ही गावांत आॅगस्ट महिन्यातील चांगल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. तयार करण्यात आलेल्या मातीला बांध व गॅबिअन बंधाºयामुळे पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर क्षेत्र उपचारामुळे भूजल पातळीतही वाढ झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माथा ते पायथा कामे झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन खरिपानंतर शेतकºयांना दुसरे पीकही घेणे शक्य होणार आहे. -विजय पवार, तालुका कृषी अधिकारीकम्पार्टमेंट बंडिंगच्या कामांमुळे शिवारात चांगले पाणी जिरले आहे. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.-प्रदीप सूर्यवंशी, नागरिक