शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

वाढत्या तपमानामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:51 PM

मानोरी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येवला तालुक्यात मागील दोन दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावरदेखील उष्णतेचा परिणाम होत आहे. मानोरी बुद्रुक, देशमाने, वाहेगाव, मुखेड फाटा आदि परिसरात शुक्रवारी तपमानाने चाळीशी पार केल्याने जनावरांना गोचीड ताप , भुळकंड आणि अशक्तपणाची लागण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आधीच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेली असताना त्यात वाढत्या तपमानाने भर घातली आहे. उन्हाच्या तीव्रतेत भरमसाठ वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असताना जनावरांना गोचीड तापाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांच्या शरीराचे तपमान उन्हामुळे १०५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून या गोचीड तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन हजार रु पयांहून अधिक खर्च करावा लागत आहे. आधीच शेतीच्या उत्पादनातून एक रुपयाही फायदा झालेला नसून त्यात दुधाला प्रती लिटर १८ ते २० रुपयांचा दर मिळत असल्याने त्यातून जनारांच्या खाद्याचा खर्चही वसूल होत नसल्याने जनावरांचा गोचीड ताप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची माहिती पशुतज्ज्ञ डॉ. संदीप शेळके यांनी दिली. या वाढलेल्या तपमानामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या दुग्ध उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच ऐन दुष्काळात जनावरे सांभाळणे आवाक्याबाहेर झालेले असताना महागड्या दराने चारा खरेदी करून शेतकरी दुग्ध व्यवसाय शेतकरी करीत आहेत. या गोचीड तापामुळे दररोज दुध उकीरड्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतक-यांवर ओढवली आहे. उन्हाची स्थिती पुढील काही दिवस अशीच राहिल्यास जनावरे दगावण्याची देखील भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. त्यामुळे चाळीशी पार केलेल्या तपमानात पुढील काही दिवस जनावरांची निगा राखणे शेतक-यांसाठी कसरतीचेच ठरणार आहे.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघात