शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारभाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 19:19 IST

पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे

ठळक मुद्दे भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पाटोदा : उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहे. भाववाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या आवकेत मोठया प्रमाणात घट झाली असून भावात तेजी आली आहे. या आठवडे बाजारात गवार एकशे वीस ते एकशे चाळीस रु पये किलो प्रमाणे विक्र ी होत होती. तर बटाटे दहा रु पये किलो असा कमी भावात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरीक त्याकडे वळलेला दिसत आहे. तसेच उन्हाळ्यात जीवाला गारवा देणाऱ्या फळभाज्या व फळांचे देखील दर वाढले आहेत. टरबूज, खरबूज, काकडी, लिंबू यांना मोठी मागणी आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.येथील आठवडे बाजारात शेपू, पालक कोथंबीर, कांदापात यांची पंधरा रु पये जुडीने विक्र ी झाली, तर मेथी आवक कमी असल्याने वीस ते पंचवीस रु पये जुडीचे भाव होते. वांग्याची आवक जास्त झाल्याने सरासरी पंधरा ते वीस रु पये किलोस भाव मिळाला. टमाटे चाळीस रु पये किलो, काकडी, बीट, द्राक्षे, सिमला मिरची भेंडी साठ रु पये, कारले ऐंशी रु पये, हिरवी मिरची शंभर रु पये किलो, करडई, पंधरा रु पये जुडी, गिलके, दोडके, ऐंशी रु पये, भोपळा पंधरा रु पये असे सर्वसाधारण भाव होते.यंदा पाऊस कमी पडल्यामुळे या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आहे त्या पाण्यावर शेतकरी भाजीपाला पिके घेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने या भाजीपाला पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतात केलेला खर्चही फिटत नाही.- आशाबाई कुंभारकर, भाजीपाला उत्पादक शेतकरी.बाजारात सर्वच भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव तेजीत होते .त्यामुळे कोणती भाजी घ्यावी हा प्रश्न होता. तेजीमुळे बाजाराचे गणति कोलमडले. तरीही भाजीपाला खरेदी करणे आवशक होते.- मंगेश देवढे, ग्राहक.