शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुसळधार पावसाने रस्ते गेले वाहून

By admin | Updated: September 19, 2015 23:20 IST

बागलाण : पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

निकवेल : बागलाण पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागामध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला असून, या भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने निकृष्ट रस्त्या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. यात वाठोडा (बारीपाडा) ते वग्रीपाडा रस्त्यादरम्यानचा आरम नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता वाहून गेला आहे. केवळ पूल फक्त शिल्लक राहिला आहे. तर रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. पुलाचा निम्मा भाग हा पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने रस्त्याचे काम मजबूत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा रस्ता ज्या ठेकेदारांनी केला आहे तसेच ह्या रस्त्यावर ज्या अधिकारीची देखरेखीची जबाबदारी होती अशा अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईची मागणी होत आहे. तसेच संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे उत्कृष्ट काम करण्यात यावे अशीही मागणी होत आहे. या भागातील डांगसौंदाणे-वाठोडा रस्त्यादरम्यानही वाठोडा गावाशेजारील रस्ता वाहून गेला असून, परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून सटाणा-वाठोडा बस सेवा खंडित झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे खचल्याने मात्र संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळापर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डांगसौदाणे ते साल्हेर गावादरम्यानचा पूलही वाहून गेल्याने या पट्ट्यातील २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील ग्रामस्थांना, डांगसौंदाणे, सटाणा, नाशिक आदि ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाठोडा (बारीपाडा) भागामध्ये गुरुवारी, शुक्रवारी मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अनेक शेतकऱ्याचे इलेक्ट्रिक मोटारी, पाइपलाइनचे पाइप, मोटरची केबल, स्टार्टर आदि शेती उपयोगी साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले. तसेच अनेक पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या भागामध्ये दौरा करून संपर्क तुटलेल्या रस्त्याच्या गावांचा व पुलाची दुरुस्ती व नूतनीकरण तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी वाठोडाचे सरपंच भाऊराव ठाकरे, मोहन ठाकरे, तुकाराम ठाकरे, लक्ष्मण महाले, नानाजी महाले, मोहन पवार, शिवाजी चौरे, पोपट पवार, बाळू पवार आदि ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)