शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

फसव्या कर्जमाफीमुळेच आत्महत्या वाढल्या

By admin | Updated: July 9, 2017 23:53 IST

सटाणा : शेतकरी कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी रद्द करून या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी व शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी देण्याबरोबरच कांद्याला हजार रुपये हमीभाव द्यावा, या मागणीसाठी बागलाण राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.कर्जमाफी योजनेत शेतकरी कुटुंब हा निकष लावण्यात आला आहे. कुटुंब शब्दाच्या व्याख्येत पती-पत्नी व अठरा वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. शेतकरी पती व पत्नी या दोघांच्या नावाने स्वतंत्र कर्ज घेतले असल्यास त्या कुटुंबाला या कर्जमाफीचा फायदा मिळत नसल्यामुळे ही फसवी कर्जमाफी म्हणून शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याचे दुर्दैवी चित्र बागलाणमध्ये बघायला मिळत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. याप्रसंगी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेखा शिंदे, पंचायत समिती सदस्य वसंतराव पवार, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, ज. ल. पाटील, जुनी शेमळीचे सरपंच अमोल बच्छाव, वंदना भामरे, किरण पाटील, अनिल चव्हाण, जे. डी. पवार, पांडुरंग सोनवणे, गणेश जाधव, पोपट चव्हाण, राजेंद्र सावकार, समीर देवरे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. राज्य सरकारने जून २०१६ ऐवजी जून २०१७ च्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. सरकारने विविध तारखांचा गोंधळ घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वंचित ठेवल्याने शेतकरी हताश झाला आहे. अटी-शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.