शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या भीतीने मुंबईकडे तुरळक वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:09 IST

मुंबईत मंगळवारच्या पावसात अडकून पडलेले शेकडो नाशिककर बुधवारी पहाटे सुखरूप नाशकात परतले असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कालच्या पावसानंतर सुरळीत झाली असली तरी, हवामान खात्याच्या इशाºयामुळे मुंबईकडे जाणारी वाहनांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, कसारा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहने थांबविण्यात आली. त्यानंतर मात्र पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.

नाशिक : मुंबईत मंगळवारच्या पावसात अडकून पडलेले शेकडो नाशिककर बुधवारी पहाटे सुखरूप नाशकात परतले असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कालच्या पावसानंतर सुरळीत झाली असली तरी, हवामान खात्याच्या इशाºयामुळे मुंबईकडे जाणारी वाहनांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, कसारा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहने थांबविण्यात आली. त्यानंतर मात्र पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होऊन मुंबई ठप्प झाली. रेल्वे व रस्ता वाहतूक बंद केल्यामुळे अनेकांना मुंबईतच रात्री अडकून पडावे लागले. साधारणत: आठ ते दहा तास वाहतुकीत अडकून पडलेल्या नाशिककरांना रात्री बारा वाजेनंतर मुंबईतून बाहेर पडण्याची संधी मिळाली. त्यामुळे रात्रभर मुंबईकडे जाणाºयांपेक्षा परत येणाºया वाहनांची महामार्गावर रीघ लागली. पहाटे नंतर संपूर्ण मुंबईतील वाहतूक सुरळीत झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. परंतु याचवेळी मुंबई व परिसरात दिवसभर अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे वाहनचालकांनी बुधवारी मुंबईला जाण्यास नकार दिला. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करण्यात कोणतीही अडचण नसून थेट मुंबईपर्यंत वाहने ये-जा करू शकतात; मात्र मुंबईला जाणाºया व येणाºया दैनंदिन वाहनांपेक्षा बुधवारी रस्त्यावर तुरळक वाहने धावली. मुंबईला जाण्यासाठी द्वारका येथे खासगी वाहनांची वाट बघणाºया प्रवाशांना वेळेवर वाहने मिळत नव्हती.खासगी वाहनचालकांचा नकारमंगळवारी मुंबईच्या पावसात व पुरात अडकून पडलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी परतल्यानंतर त्यांनी कथन केलेला अनुभव पाहून बुधवारी वाहनचालकांनी मुंबईच्या प्रवासी वाहतुकीला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नाशिकमधून दररोज मुंबईला प्रवासी घेऊन जाणारी शेकडो खासगी वाहने रस्त्यावर उतरली नाहीत.जुन्या कसारा घाटात दरड कोसळलीसकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान जुन्या कसारा घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ वाहने थांबविण्यात आली. के्रनच्या साहाय्याने दरड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने दिली.