शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

पावसाच्या भीतीने मुंबईकडे तुरळक वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:09 IST

मुंबईत मंगळवारच्या पावसात अडकून पडलेले शेकडो नाशिककर बुधवारी पहाटे सुखरूप नाशकात परतले असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कालच्या पावसानंतर सुरळीत झाली असली तरी, हवामान खात्याच्या इशाºयामुळे मुंबईकडे जाणारी वाहनांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, कसारा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहने थांबविण्यात आली. त्यानंतर मात्र पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.

नाशिक : मुंबईत मंगळवारच्या पावसात अडकून पडलेले शेकडो नाशिककर बुधवारी पहाटे सुखरूप नाशकात परतले असून, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कालच्या पावसानंतर सुरळीत झाली असली तरी, हवामान खात्याच्या इशाºयामुळे मुंबईकडे जाणारी वाहनांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, कसारा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहने थांबविण्यात आली. त्यानंतर मात्र पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होऊन मुंबई ठप्प झाली. रेल्वे व रस्ता वाहतूक बंद केल्यामुळे अनेकांना मुंबईतच रात्री अडकून पडावे लागले. साधारणत: आठ ते दहा तास वाहतुकीत अडकून पडलेल्या नाशिककरांना रात्री बारा वाजेनंतर मुंबईतून बाहेर पडण्याची संधी मिळाली. त्यामुळे रात्रभर मुंबईकडे जाणाºयांपेक्षा परत येणाºया वाहनांची महामार्गावर रीघ लागली. पहाटे नंतर संपूर्ण मुंबईतील वाहतूक सुरळीत झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. परंतु याचवेळी मुंबई व परिसरात दिवसभर अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे वाहनचालकांनी बुधवारी मुंबईला जाण्यास नकार दिला. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करण्यात कोणतीही अडचण नसून थेट मुंबईपर्यंत वाहने ये-जा करू शकतात; मात्र मुंबईला जाणाºया व येणाºया दैनंदिन वाहनांपेक्षा बुधवारी रस्त्यावर तुरळक वाहने धावली. मुंबईला जाण्यासाठी द्वारका येथे खासगी वाहनांची वाट बघणाºया प्रवाशांना वेळेवर वाहने मिळत नव्हती.खासगी वाहनचालकांचा नकारमंगळवारी मुंबईच्या पावसात व पुरात अडकून पडलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी परतल्यानंतर त्यांनी कथन केलेला अनुभव पाहून बुधवारी वाहनचालकांनी मुंबईच्या प्रवासी वाहतुकीला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नाशिकमधून दररोज मुंबईला प्रवासी घेऊन जाणारी शेकडो खासगी वाहने रस्त्यावर उतरली नाहीत.जुन्या कसारा घाटात दरड कोसळलीसकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान जुन्या कसारा घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ वाहने थांबविण्यात आली. के्रनच्या साहाय्याने दरड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने दिली.