शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

By admin | Updated: August 4, 2016 01:12 IST

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

 त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसात तब्बल ४२१ मि.मी. असा विक्रमी पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात बसरला. अवघ्या तीन दिवसांत ४२१ मि.मी.पाऊस पडणे म्हणजे रेकॉर्डच म्हणावा लागले. या तुफान पावसाच्या माऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी रोपे वाहून गेली आहेत. बांध फुटले. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे. त्र्यंबकला गेले तीन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी बियाणे उपलब्ध करणे वगैरे सर्वच बाबी नव्याने करणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. त्यापेक्षा शेती नाही केली ते परवडले. एवढे नुकसान कुणाला झेपणार आहे, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातला भाग नाही, मात्र अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे करून तातडीने मदत कार्य सुरू करावे. पीकविमा योजनेची मुदत वाढवून द्यावी, नदी-नाल्यांकाठी असलेल्या घरांचे व शहरात दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांचे नुकसान, नागली, वरई, खुरासणी, उडीद, भुईमूग आदिंचे पिकांचेही नुकसान झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी ओहळ, नाले, दुथडी भरून वाहत असल्याने जमिनीदेखील खचल्या आहेत. पर्यायाने बांध फुटले आणि शेती वाहून गेली. त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कडलग यांनी एका पत्रकान्वये केली आहे.(वार्ताहर)