शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

By admin | Updated: August 4, 2016 01:12 IST

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

 त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसात तब्बल ४२१ मि.मी. असा विक्रमी पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात बसरला. अवघ्या तीन दिवसांत ४२१ मि.मी.पाऊस पडणे म्हणजे रेकॉर्डच म्हणावा लागले. या तुफान पावसाच्या माऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी रोपे वाहून गेली आहेत. बांध फुटले. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे. त्र्यंबकला गेले तीन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी बियाणे उपलब्ध करणे वगैरे सर्वच बाबी नव्याने करणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. त्यापेक्षा शेती नाही केली ते परवडले. एवढे नुकसान कुणाला झेपणार आहे, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातला भाग नाही, मात्र अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे करून तातडीने मदत कार्य सुरू करावे. पीकविमा योजनेची मुदत वाढवून द्यावी, नदी-नाल्यांकाठी असलेल्या घरांचे व शहरात दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांचे नुकसान, नागली, वरई, खुरासणी, उडीद, भुईमूग आदिंचे पिकांचेही नुकसान झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी ओहळ, नाले, दुथडी भरून वाहत असल्याने जमिनीदेखील खचल्या आहेत. पर्यायाने बांध फुटले आणि शेती वाहून गेली. त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कडलग यांनी एका पत्रकान्वये केली आहे.(वार्ताहर)