शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

By admin | Updated: August 4, 2016 01:12 IST

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान

 त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसात तब्बल ४२१ मि.मी. असा विक्रमी पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात बसरला. अवघ्या तीन दिवसांत ४२१ मि.मी.पाऊस पडणे म्हणजे रेकॉर्डच म्हणावा लागले. या तुफान पावसाच्या माऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी रोपे वाहून गेली आहेत. बांध फुटले. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे. त्र्यंबकला गेले तीन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी बियाणे उपलब्ध करणे वगैरे सर्वच बाबी नव्याने करणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. त्यापेक्षा शेती नाही केली ते परवडले. एवढे नुकसान कुणाला झेपणार आहे, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातला भाग नाही, मात्र अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे करून तातडीने मदत कार्य सुरू करावे. पीकविमा योजनेची मुदत वाढवून द्यावी, नदी-नाल्यांकाठी असलेल्या घरांचे व शहरात दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांचे नुकसान, नागली, वरई, खुरासणी, उडीद, भुईमूग आदिंचे पिकांचेही नुकसान झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी ओहळ, नाले, दुथडी भरून वाहत असल्याने जमिनीदेखील खचल्या आहेत. पर्यायाने बांध फुटले आणि शेती वाहून गेली. त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कडलग यांनी एका पत्रकान्वये केली आहे.(वार्ताहर)