शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:32 IST

गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सुरूच असून, शनिवार पाठोपाठ रविवारीही दिवसभर पाऊस असल्याने अनेक मोठ्या गणेश मंडळांचे देखावेच पूर्ण होऊ शकले नाहीत, तर भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ शकली नाही.

नाशिक : गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सुरूच असून, शनिवार पाठोपाठ रविवारीही दिवसभर पाऊस असल्याने अनेक मोठ्या गणेश मंडळांचे देखावेच पूर्ण होऊ शकले नाहीत, तर भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ शकली नाही. आधीच शासनाच्या नियमांच्या जंजाळामुळे गणेश मंडळांचा उत्साह मावळला असून, सार्वजनिक उत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या घटली आहे. मंडपाच्या आकारावर मर्यादा आल्याने बहुतांशी मंडळांनी आरास करण्याऐवजी केवळ गणेशमूर्तीच ठेवल्या आहेत. तरीही गणेश मंडळांनी आरास अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशीपासून पाऊस सुरू झाल्याने मंडळांचे सादरीकरण करणे अडचणीत आले आहेत. मोठ्या मंडळांचे देखावे तसे विलंबानेच होत असले तरी यंदा पावसामुळे अन्य मंडळांनादेखील आरास पूर्ण करता आलेली नाही. गुरुवारपासूनच खरे तर जोरदार पावसाला सुरुवात झाली होती आता सलग पाऊस सुरू राहिला आणि शनिवार- रविवार या सुटीच्या दिवशी अशीच स्थिती राहिल्याने नाशिककरांना देखावे पाहण्याकरिता घराबाहेर पडता आले नाही. रविवारी सकाळपासूनच संततधार कायम असल्याने सुटीचा दिवस असूनही गणेशभक्त देखावे पहायला फिरकले नाहीत. सोमवारी पावसाने विश्रांती दिली तरच मोठी मंडळे सजावट पूर्ण करू शकतील अन्यथा त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.