त्र्यंबकेश्वर-तालुक्यातील गोरठाण या गावातील वीजधारकांनी विजेची बिले थकविल्याने जळालेला ट्रान्सफॉर्मर वितरण कंपनी वितरण कंपनी बसवित नसल्याने या भागातील रहिवासी व शेतकरी मंडळींचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.यासंदर्भात येथील सहायक अभियंता यांच्याकडे चौकशी केली असता सर्व गाव थकबाकीदार असल्याने किमान ८० टक्के रक्कम भरल्याशिवाय नवीन ट्रान्सफॉर्मर बसविता येणार नसल्याचे सांगण्यात आले.तथापि, गावातील प्रामाणिकपणे नियमित वीजबिले भरतात. काही कुटुंबांनाही याचा फटका बसत आहे. दुसर्यांच्या चुकांचा भुर्दंड आम्हाला का सोसावा लागत आहे. त्यांची शिक्षा आम्ही काय म्हणून भोगायची असाही सवाल त्यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे नवीन सिंगल फेज लाईनचे कामदेखील अपूर्ण असल्याचे समजते. या संदर्भात अधिक चौकशी केली असता ज्या भागात सिंगल फेज लाईन आहे. तेथील लोक आकडे टाकून वीज चोरी करतात. त्यामुळेच जळालेल्या डीपीचे काम पूर्ण होत नसावे. वास्तविक आकडे टाकून वीज चोरी होत असेल तर तेथील वीज कर्मचारी काय काम करतो असाही सवाल उपस्थित होत आहे. प्रामाणिकपणे वीज भरणार्या वीजग्राहकांना मात्र नियमित वीज सेवा का दिली जात नाही असे नियमित वीजबिल भरणार्या ग्राहकांचे म्हणणे आहे. सदरचा ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)---
वीजबिल थकबाकीमुळे गोरठाणवासीय अंधारात
By admin | Updated: May 5, 2014 22:32 IST