शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड

By admin | Updated: October 13, 2014 00:48 IST

गावागावात रंगू लागले निवडणुकीच्या गप्पांचे फड

 

सिन्नर : विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मतदानासाठी शासकीय यंत्रना सज्ज झाली असून, उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या भोंग्यांनी गावे ढवळून निघाली असून, तालुक्यातील गावागावात केवळ निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू लागले असल्याचे चित्र आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिके काढणीस तयार होऊ लागली आहे. अद्याप पिकांच्या काढणीस कालावधी असून, पिके निघाल्यावर रब्बी हंगामाची कामे सुरु होणार आहे. खरीप हंगाम उरकण्याच्या व रब्बी हंगाम सुरु होण्याच्या कालावधीतच निवडूक आल्याने शेतकऱ्यांना मोकळा वेळ मिळू लागला आहे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या विचारांचे, पक्षांचे व नेत्यांचे कार्यकर्ते हमखास दिसतात. त्यांनी आपापल्या नेत्यांचा प्रचार करताना आपलाच नेता कसा श्रेष्ठ असून तो कसा निवडूण येणार आहे याचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली असून, नेत्यांचे मार्केटिंग केले जात असल्याने याच एकमेव चर्चेवर गावागावतील पारांवर चर्चांना उत आला आहे. ग्रामपंचायत, विकास संस्थांच्या निवडणुकीपासून थेट लोकसभेच्या निवडणुकीतही गावगाड्यातील अठरापगड जातींच्या मतदारांवर सर्वच पक्षांचे व उमेदवारांचे लक्ष केंद्रित होत असते. त्यांचा विकास कसा केला अथवा कसे कल्याण केले जाणार आहे याबाबत पटवून दिले जाते. आपलाच उमेदवार चांगला असून, तोच निवडून येणार असल्याच्या चर्चेत गावात अनेकदा वादाचे व हमरीतुमरीचे प्रसंगी ओढवेले जाते. आपल्याला एकाच गावात रहायचे आहे कोणीही निवडून गेले तरी आपल्याला काही फरक पडणार आहे का, गड्या आपले काम आपणच केले तरच भाकर मिळणार आहे, असे म्हणून ज्येष्ठ वाद सोडवतात, प्रचाराच्या गाड्यांतून देण्यात येणाऱ्या घोषणा, भोंग्यांवर वाजवणारी गाणी, दाखविण्यात येणाऱ्या चित्रफिती यातून लहानथोरांची करमणूक होत आहे. गावांतील पारांवर रंगणाऱ्या गप्पा गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत जात असून, घरोघरी आता दूरचित्रवाणी संच झाल्याने देशासह जगातील घडामोडींची माहिती घरात बसून मिळू लागल्याने त्यावरही चर्चा झडत असतात. (वार्ताहर)