शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

निवडणुकीमुळे ‘समृद्धी’ महामार्गाच्या विषयाला बगल

By admin | Updated: February 10, 2017 01:13 IST

प्रशासनही थंड : विरोधी उमेदवारांकडून प्रचाराचा मुद्दा

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गेल्या महिन्यापर्यंत आग्रही असलेल्या प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल लक्षात घेता, आपली पावले संथ केली असून, दुसरीकडे महामार्गासाठी जागा संपादित करू पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीत हाच प्रचाराचा मुद्दा करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून जाणार असून, त्यासाठी शासनाने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महामार्गाच्या बांधणीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या गटाची माहिती संकलित करून ती लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व भूमी अभिलेख खात्याच्या संयुक्त मोजणीला जमीनमालकांनी विरोध केल्यानंतर शासनाने त्यावर पर्याय म्हणून ड्रोनच्या सहाय्याने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात न जाता मोजणीही करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही कडाडून विरोध करण्यात आला असतानाही रस्ते विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या प्राधिकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही तालुक्यात महामार्गासाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्या व त्यावर जागामालकांच्या हरकती तसेच सूचना मागविल्या असता, गावेच्या गावे या अधिसूचनेच्या विरोधात उभ्या ठाकून त्यांनी जमीन देण्यास विरोध असल्याचे लेखी पत्रेच शासनाकडे सादर केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रालयात बैठका आयोजित करून खुद्द फडणवीस यांनीच लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग व्हावा व त्यासाठी शेतकऱ्यांना हवा तितका मोबदला देण्याची तयारीही शासनाने दर्शविली. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय पातळीवर जागामालक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. महामार्गासाठी जागा संपादित करताना सरकारविरुद्ध वातावरण निर्माण होऊ नये याची काळजीही त्यांनी घेतली. तथापि, विरोधी पक्षांनी या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यास विरोध दर्शवून जागामालक शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले बळ उभे केल्याने सत्ताधारी भाजपाची अडचण झाली. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असून, त्यासाठी ‘समृद्धी’ च्या जागा संपादनाचा विषय प्रचाराचा मुद्दा करण्यात आला आहे.