शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

निवडणुकीमुळे ‘समृद्धी’ महामार्गाच्या विषयाला बगल

By admin | Updated: February 10, 2017 01:13 IST

प्रशासनही थंड : विरोधी उमेदवारांकडून प्रचाराचा मुद्दा

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गेल्या महिन्यापर्यंत आग्रही असलेल्या प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल लक्षात घेता, आपली पावले संथ केली असून, दुसरीकडे महामार्गासाठी जागा संपादित करू पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीत हाच प्रचाराचा मुद्दा करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून जाणार असून, त्यासाठी शासनाने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महामार्गाच्या बांधणीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या गटाची माहिती संकलित करून ती लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व भूमी अभिलेख खात्याच्या संयुक्त मोजणीला जमीनमालकांनी विरोध केल्यानंतर शासनाने त्यावर पर्याय म्हणून ड्रोनच्या सहाय्याने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात न जाता मोजणीही करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही कडाडून विरोध करण्यात आला असतानाही रस्ते विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या प्राधिकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही तालुक्यात महामार्गासाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्या व त्यावर जागामालकांच्या हरकती तसेच सूचना मागविल्या असता, गावेच्या गावे या अधिसूचनेच्या विरोधात उभ्या ठाकून त्यांनी जमीन देण्यास विरोध असल्याचे लेखी पत्रेच शासनाकडे सादर केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रालयात बैठका आयोजित करून खुद्द फडणवीस यांनीच लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग व्हावा व त्यासाठी शेतकऱ्यांना हवा तितका मोबदला देण्याची तयारीही शासनाने दर्शविली. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय पातळीवर जागामालक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. महामार्गासाठी जागा संपादित करताना सरकारविरुद्ध वातावरण निर्माण होऊ नये याची काळजीही त्यांनी घेतली. तथापि, विरोधी पक्षांनी या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यास विरोध दर्शवून जागामालक शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले बळ उभे केल्याने सत्ताधारी भाजपाची अडचण झाली. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असून, त्यासाठी ‘समृद्धी’ च्या जागा संपादनाचा विषय प्रचाराचा मुद्दा करण्यात आला आहे.