शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे ‘समृद्धी’ महामार्गाच्या विषयाला बगल

By admin | Updated: February 10, 2017 01:13 IST

प्रशासनही थंड : विरोधी उमेदवारांकडून प्रचाराचा मुद्दा

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गेल्या महिन्यापर्यंत आग्रही असलेल्या प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल लक्षात घेता, आपली पावले संथ केली असून, दुसरीकडे महामार्गासाठी जागा संपादित करू पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीत हाच प्रचाराचा मुद्दा करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून जाणार असून, त्यासाठी शासनाने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महामार्गाच्या बांधणीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या गटाची माहिती संकलित करून ती लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व भूमी अभिलेख खात्याच्या संयुक्त मोजणीला जमीनमालकांनी विरोध केल्यानंतर शासनाने त्यावर पर्याय म्हणून ड्रोनच्या सहाय्याने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात न जाता मोजणीही करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही कडाडून विरोध करण्यात आला असतानाही रस्ते विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या प्राधिकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही तालुक्यात महामार्गासाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्या व त्यावर जागामालकांच्या हरकती तसेच सूचना मागविल्या असता, गावेच्या गावे या अधिसूचनेच्या विरोधात उभ्या ठाकून त्यांनी जमीन देण्यास विरोध असल्याचे लेखी पत्रेच शासनाकडे सादर केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रालयात बैठका आयोजित करून खुद्द फडणवीस यांनीच लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग व्हावा व त्यासाठी शेतकऱ्यांना हवा तितका मोबदला देण्याची तयारीही शासनाने दर्शविली. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय पातळीवर जागामालक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. महामार्गासाठी जागा संपादित करताना सरकारविरुद्ध वातावरण निर्माण होऊ नये याची काळजीही त्यांनी घेतली. तथापि, विरोधी पक्षांनी या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यास विरोध दर्शवून जागामालक शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले बळ उभे केल्याने सत्ताधारी भाजपाची अडचण झाली. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असून, त्यासाठी ‘समृद्धी’ च्या जागा संपादनाचा विषय प्रचाराचा मुद्दा करण्यात आला आहे.