शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

रखडलेल्या मांजरपाड्याने दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: August 27, 2016 00:07 IST

रखडलेल्या मांजरपाड्याने दुष्काळाच्या झळा

कायमदत्ता महाले येवलायंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नद्या, नाले ओसंडून वाहिले. मात्र येवला तालुका कोरडाच राहिला. तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे रखडलेला असल्यामुळे दुष्काळाच्या छटा कायम आहेत. दमदार नेतृत्वाच्या अभावामुळे मांजरपाडा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. सत्तेचा वापर मांजरपाडा प्रकल्प मार्गी लावण्याकडे होत नसल्याचे चित्र आहे. प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नसून शांत झालेल्या आंदोलनाची वात पेटवण्याचा प्रयत्न लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सर्वपक्षांच्या मदतीने केला. पुणेगाव-दरसवाडी कालव्याची चाचणी घेण्यासाठी पाणी सोडावे,अशी मागणी रेटली गेली.एकीचे बळ म्हणून काही प्रमाणात प्रशासन हलले असले तरी,प्रत्यक्ष चाचणीची वाट पहावी लागेल. निधीअभावी रखडलेले राज्यातील प्रकल्प निधी देऊन पूर्ण केले जातील व सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे जलसंपदा खात्याचे उद्दीष्ट असल्याचे सुतोवाच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मध्यंतरी केल्याने येवला तालुक्याच्या अस्मितेचा मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागणार अशी चर्चा दोन महिन्यांपूर्वी सरू झाली होती. परंतु अंतिम टप्प्यात येऊन ठप्प झालेले मांजरपाडयाचे काम निधीअभावी अद्यापही रखडलेलेच आहे. नियोजनांत असलेला निधी इतरत्र वळवला गेल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. सुरगाणा तालुक्यातील केम पर्वतरांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम सध्या ठप्प झाले आहे. जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा- १ वळण योजनेबाबत आता थेट कार्यवाहीसाठी प्रयत्न करावेत अशी हाक अनेक वेळा दिली गेली. परंतु अद्यापही येवला तालुकावासीयांना दिलासा मिळाला नाही. मांजरपाडा- १ वळण योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ४५४ कोटी रु पयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. तसेच आघाडी शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रु पयांचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिले आहे. त्यामुळे त्यातीलच २८ कोटीचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पासाठी वळविला. २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. आता युती सरकारकडे मांजरपाडा वळण योजनेसाठी ४५४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत लालिफतीत अडकलेला प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागाच्या या प्रकल्पाचे केवळ ७५० मीटर एवढ्या लांबीच्या बोगद्यासह काही पूल व अल्पखर्चाची कामे बाकी आहेत. येवल्याच्या उत्तरपूर्व भागात थेट डोंगरगावपर्यंत पाटातून पाणी पाहण्यासाठी तीन पिढ्या खपल्या आहेत. मांजरपाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. श्रेयवादासह राजकीय लढाई निवडणुकीत राजकीय पक्षांनी जरूर खेळावी, पण तालुक्याच्या या पाणीप्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा. सत्ताधार्यांनी या कामात आता सारे कौशल्य पणाला लावावे अशी अपेक्षा आहे. सत्तेत नसताना भाजपानेदेखील हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून भाषणबाजी केली आहे. आता मात्र निर्णायक लढ्यात उत्तरपूर्व भागात पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची तयारी या भागातील शेतकर्यांनी चालवली आहे.अस्मितेच्या पाणीप्रश्नासाठी पक्षाचे जोडे बाजूला सारून आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता आहे.