शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

वादामुळे पाणी आरक्षणाची बैठक लांबणीवर

By admin | Updated: November 4, 2015 23:42 IST

वादामुळे पाणी आरक्षणाची बैठक लांबणीवर

नाशिक : पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला उपलब्ध साठा व त्याचे पुढच्या वर्षभरासाठी करावयाच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दरवर्षी होणारी बैठक यंदा लांबणीवर पडली असून, त्यामागे मराठवाड्याचा पाणीप्रश्नच कारणीभूत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन झालेले नसताना जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने पाणी आरक्षण बैठक चांगलीच गाजण्याचे संकेतही मिळू लागले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण जेमतेम राहिल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने टंचाईची परिस्थिती कायम राहणार आहे. अशाही परिस्थितीत जे काही पाणी आहे त्याचे पिण्यासाठी, उद्योग व सिंचनासाठी नियोजन करणे क्रमप्राप्त असून, साधारणत: आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात त्याचा निर्णय पालकमंत्री, जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतला जातो. परंतु पालकमंत्री व जिल्हाधिकारी बोस्टनला गेल्यामुळे ही बैठक आॅक्टोबरमध्ये होऊ शकली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती होईल असे मानले जात असतानाच, जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय अचानक पुढे आल्यामुळे जिल्ह्णातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसेच शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होऊन ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. जनक्षोभ उसळण्याची शक्यता गृहीत धरून बैठक लांबणीवर टाकण्यात आली असली तरी, या बैठकीमुळे धरणातील पाण्याच्या आवर्तनावर परिणाम होऊ लागला आहे. जिल्ह्णाचे पालकमंत्री हेच जलसंपदामंत्री असल्यामुळे तर या बैठकीला विशेष महत्त्व असून, प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. जायकवाडीसाठी गंगापूर समूहातून पाणी सोडले जात असून, त्यानंतर उर्वरित पाण्यातूनच नियोजन करावे लागणार आहे ते पाहता, नाशिक महापालिकेसह अन्य पाणीपुरवठा योजना, औद्योगिक विकास महामंडळ, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र, त्र्यंबकेश्वर आदिंसाठी राखून ठेवण्याच्या पाण्यात मोठी कपात करावी लागणार आहे. शेतीसाठी गंगापूर धरणातून पाणीच मिळणार नसल्याने आरक्षण बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.