शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

वादामुळे पाणी आरक्षणाची बैठक लांबणीवर

By admin | Updated: November 4, 2015 23:42 IST

वादामुळे पाणी आरक्षणाची बैठक लांबणीवर

नाशिक : पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला उपलब्ध साठा व त्याचे पुढच्या वर्षभरासाठी करावयाच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दरवर्षी होणारी बैठक यंदा लांबणीवर पडली असून, त्यामागे मराठवाड्याचा पाणीप्रश्नच कारणीभूत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन झालेले नसताना जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने पाणी आरक्षण बैठक चांगलीच गाजण्याचे संकेतही मिळू लागले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण जेमतेम राहिल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने टंचाईची परिस्थिती कायम राहणार आहे. अशाही परिस्थितीत जे काही पाणी आहे त्याचे पिण्यासाठी, उद्योग व सिंचनासाठी नियोजन करणे क्रमप्राप्त असून, साधारणत: आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात त्याचा निर्णय पालकमंत्री, जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतला जातो. परंतु पालकमंत्री व जिल्हाधिकारी बोस्टनला गेल्यामुळे ही बैठक आॅक्टोबरमध्ये होऊ शकली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती होईल असे मानले जात असतानाच, जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय अचानक पुढे आल्यामुळे जिल्ह्णातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसेच शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होऊन ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. जनक्षोभ उसळण्याची शक्यता गृहीत धरून बैठक लांबणीवर टाकण्यात आली असली तरी, या बैठकीमुळे धरणातील पाण्याच्या आवर्तनावर परिणाम होऊ लागला आहे. जिल्ह्णाचे पालकमंत्री हेच जलसंपदामंत्री असल्यामुळे तर या बैठकीला विशेष महत्त्व असून, प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. जायकवाडीसाठी गंगापूर समूहातून पाणी सोडले जात असून, त्यानंतर उर्वरित पाण्यातूनच नियोजन करावे लागणार आहे ते पाहता, नाशिक महापालिकेसह अन्य पाणीपुरवठा योजना, औद्योगिक विकास महामंडळ, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र, त्र्यंबकेश्वर आदिंसाठी राखून ठेवण्याच्या पाण्यात मोठी कपात करावी लागणार आहे. शेतीसाठी गंगापूर धरणातून पाणीच मिळणार नसल्याने आरक्षण बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.