शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

संविधानामुळे भारत देश एकसंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:03 IST

विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशाने कितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असा आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देहेमंत गोखले : येवला येथे प्रागतिक व्याख्यानमाला

येवला : विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशानेकितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असा आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केला.येथील समता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधानाने सामान्य माणसाला काय दिले?’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना न्या. गोखले बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते.प्रारंभी माजी आमदार मारुतीराव पवार यांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी घालून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार नेते अंबादास बनकर, तहसीलदार रोहिदास वारुळे, येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे व्यासपीठावर उपस्थित होते.दरम्यान, भारतीय सेना दलात २८ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले साताळी येथील भूमिपुत्र अरुण नामदेव कोकाटे यांचा न्या. गोखले यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मेजर कोकाटे यांच्या मातोश्री मुक्ताबाई कोकाटे, पत्नी ज्योती कोकाटे उपस्थित होत्या. मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. गमे यांनी केले. प्रा. अर्जुन कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी संत तुकाराम महाराजांच्या सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी या अभंगावर नृत्य सादर केले. पाहुण्यांचा परिचय अ‍ॅड. बाबासाहेब देशमुख यांनी करून दिला. दिनकर दाणे यांनी आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक