शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:20 IST

देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

नाशिकरोड : देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.  देवळालीगाव महात्मा गांधी पुतळा व गाडेकर मळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजार पसरत चालला आहे. वाजवी किमतीत व ताजा शेतीमाल मिळत असल्याने आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी विक्रेत्यांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे.  देवळालीगाव सोमवार पेठ येथील मोकळ्या जागेत गेल्या कित्येक वर्षांपासून सोमवारचा आठवडे बाजार भरतो. नाशिकरोडच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आपला शेतीमाल, किराणा दुकानदार व विविध वस्तू विक्रेते आठवडे बाजारात दुकान थाटत होते. सुविधांचा अभाव, वर्गणीचा त्रास, दादागिरी आदी कारणांमुळे त्रस्त झालेले विक्रेते आठवडे बाजाराच्या मूळ जागेवर बसण्यापेक्षा आठवडे बाजाराकडे देवळालीगावातून येणाऱ्या रस्त्यावर बसू लागले. त्यामुळे आठवडे बाजाराच्या मूळ जागेवर बसणाºया विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. अनेकजण रस्त्यावरच दुकाने थाटून बसत आहेत. मनमाड-इगतपुरी शटल रेल्वेमुळे शेतकरी भाजी व इतर वस्तू विक्रेते दुपारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजारात येतात व व्यवसाय करून सायंकाळी पुन्हा शटलने रवाना होतात. आठवडे बाजारात अत्यंत कमी किमतीत ताजा शेतीमाल, अन्नधान्य व इतर विविध वस्तू मिळत असल्याने ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देवळालीगाव, विहितगाव, राजवाडा, सुभाषरोड, रोकडोबावाडी, जयभवानीरोड, आर्टिलरी सेंटररोड, आनंदनगर, जगताप मळा आदी भागातून रहिवासी, महिला खूप मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात.आठवडे बाजाराच्या कक्षा वाढत चालल्या आहेत. सायंकाळी ७ वाजता शटल रेल्वे येत असल्याने अनेक विक्रेते निघून जातात. मात्र स्थानिक विक्रेते उशिरापर्यंत असतात. रात्री रस्त्यावर भाजीपाला व केरकचरा साठतो. मंगळवारी सकाळी रस्त्यावरील भाजीपाला, केरकचरा उचलण्याची पाळी मनपा कर्मचाºयांवर येते.लाखोंची आर्थिक उलाढालआठवडे बाजारात रास्त भावात ताजा शेतीमाल, धान्य व इतर गरजेच्या वस्तू मिळत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीकरिता येतात. यामुळे दर सोमवारी आठवडे बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी मूळ जागा सोडून रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटत असल्याने वाहतुकीची कोंडी व तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. आरडाओरड, केरकचरा, दुर्गंधी यामुळे रहिवासी वैतागले आहेत. मात्र बाजारात चहूबाजूने ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने हनुमानाच्या शेपटीप्रमाणे बाजार लांबत चालला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMarketबाजार