शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:20 IST

देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

नाशिकरोड : देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.  देवळालीगाव महात्मा गांधी पुतळा व गाडेकर मळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजार पसरत चालला आहे. वाजवी किमतीत व ताजा शेतीमाल मिळत असल्याने आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी विक्रेत्यांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे.  देवळालीगाव सोमवार पेठ येथील मोकळ्या जागेत गेल्या कित्येक वर्षांपासून सोमवारचा आठवडे बाजार भरतो. नाशिकरोडच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आपला शेतीमाल, किराणा दुकानदार व विविध वस्तू विक्रेते आठवडे बाजारात दुकान थाटत होते. सुविधांचा अभाव, वर्गणीचा त्रास, दादागिरी आदी कारणांमुळे त्रस्त झालेले विक्रेते आठवडे बाजाराच्या मूळ जागेवर बसण्यापेक्षा आठवडे बाजाराकडे देवळालीगावातून येणाऱ्या रस्त्यावर बसू लागले. त्यामुळे आठवडे बाजाराच्या मूळ जागेवर बसणाºया विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. अनेकजण रस्त्यावरच दुकाने थाटून बसत आहेत. मनमाड-इगतपुरी शटल रेल्वेमुळे शेतकरी भाजी व इतर वस्तू विक्रेते दुपारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजारात येतात व व्यवसाय करून सायंकाळी पुन्हा शटलने रवाना होतात. आठवडे बाजारात अत्यंत कमी किमतीत ताजा शेतीमाल, अन्नधान्य व इतर विविध वस्तू मिळत असल्याने ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देवळालीगाव, विहितगाव, राजवाडा, सुभाषरोड, रोकडोबावाडी, जयभवानीरोड, आर्टिलरी सेंटररोड, आनंदनगर, जगताप मळा आदी भागातून रहिवासी, महिला खूप मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात.आठवडे बाजाराच्या कक्षा वाढत चालल्या आहेत. सायंकाळी ७ वाजता शटल रेल्वे येत असल्याने अनेक विक्रेते निघून जातात. मात्र स्थानिक विक्रेते उशिरापर्यंत असतात. रात्री रस्त्यावर भाजीपाला व केरकचरा साठतो. मंगळवारी सकाळी रस्त्यावरील भाजीपाला, केरकचरा उचलण्याची पाळी मनपा कर्मचाºयांवर येते.लाखोंची आर्थिक उलाढालआठवडे बाजारात रास्त भावात ताजा शेतीमाल, धान्य व इतर गरजेच्या वस्तू मिळत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीकरिता येतात. यामुळे दर सोमवारी आठवडे बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी मूळ जागा सोडून रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटत असल्याने वाहतुकीची कोंडी व तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. आरडाओरड, केरकचरा, दुर्गंधी यामुळे रहिवासी वैतागले आहेत. मात्र बाजारात चहूबाजूने ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने हनुमानाच्या शेपटीप्रमाणे बाजार लांबत चालला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMarketबाजार