शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

बाणगंगा नदीवरील पूल खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:13 IST

निफाड तालुक्यातील ओणे येथील पुलाची दुरवस्था झाली असून, तुटलेल्या पुलावरून ग्रामस्थ व विद्यार्थी कसेबसे नदी पार करत आहेत. पूर आल्यानंतर तर गावाचाच संपर्कच तुटतो. जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असून, येथे नवीन पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील ओणे येथील पुलाची दुरवस्था झाली असून, तुटलेल्या पुलावरून ग्रामस्थ व विद्यार्थी कसेबसे नदी पार करत आहेत. पूर आल्यानंतर तर गावाचाच संपर्कच तुटतो. जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असून, येथे नवीन पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.निफाड तालुक्यातील ओझर, सुकेणे, पिंपळस या मार्गावर असलेले ओणे येथील गावकरी बाणगंगा नदीवरील तुटलेल्या पुलावरून जीव जोखमीत घालून प्रवास करीत आहेत. ओझर-सुकेणेला जोडण्यासाठी बाणगंगा नदीवर छोटा पूल आहे. गेल्या वर्षी बाणगंगेला आलेल्या महापुरात सदर फरशीपूल वाहून गेला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवर भराव टाकून डागडुजी करण्यात आली होती; परंतु यंदाच्या पावसाळ्यातील सलग तीन पुरांमुळे तात्पुरता टाकलेला भरावही वाहून गेला असून, सध्या ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि शेतकºयांचे अतोनात हाल होत आहेत. गेल्या आठवड्यात तब्बल तीन दिवस गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी गावातून ओझर, सुकेणे, पिंपळगाव, नाशिक या भागात जाणाºया विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात. तसेच ओणे येथून पिंपळगाव, ओझर भागात शेतमाल विक्रीसाठी नेणे जिकिरीचे ठरत असून, सुकेणेमार्गे चार किलोमीटर अंतराचा फेरा मारून शेतकºयांना ओझर गाठावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचा वेळ, पैशाचा अपव्यय होतो. जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकºयांनी केली आहे. ओणेकरांच्या गैरसोयींकडे लक्ष देऊन नवीन पूल मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या निफाड तालुक्यातील बाणगंगा काठ समस्याग्रस्त बनला आहे. नाशिक-सुकेणे शहर बससेवेचे कमी झालेले फेरे, ओझर-सुकेणे, मौजे सुकेणे-ओणे-खेरवाडी, कसबे सुकेणे-कोकणगाव, सुकेणे-चांदोरी, सुकेणे-निसाका, सुकेणे-पिंपळस या रस्त्यांची दुर्दशा, कसबे सुकेणे परिसरात सुरू असलेले अवैध धंदे, भरदिवसा होणाºया चोºया, बाणगंगाकाठची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरातील मेनरोड व हायस्कूल रस्त्याची झालेली वाताहत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची अनुपस्थिती व त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल अशा विविध समस्यांनी बाणगंगाकाठ ग्रासला आहे. रस्त्यांची दुर्दशा कधी थांबेल, असा सवाल कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी या भागातील जनतेने केला आहे.