शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:50 IST

इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत.

ठळक मुद्देपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव : गव्हाला अळीचा फटका

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली अन् आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे काही परिसरात भाजीपाला पिके तसेच मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याच बरोबर गहू, हरभरा या पिकांनादेखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असली तरी थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकºयांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहे. परंतु हवामानात सुधारणा न झाल्यास शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल यामुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.थंडी कमी असल्याने गव्हावर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. या सोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रतिकूल हवामानामुळे कांद्यालाही करप्याने वेढले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Loanपीक कर्ज