शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजारभावात घट

By admin | Updated: July 10, 2016 01:07 IST

आडत प्रकरण : शेतकऱ्यांची कोंडी

पंचवटी : शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असे आदेश शासनाने बाजार समित्यांना दिल्याने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शनिवारपासून लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे अवघा दहा टक्केमाल दाखल झाला आणि भावही मोठ्या प्रमाणात कोसळले.शनिवार सकाळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल किरकोळ व्यापारी व चवळी दलालांनी खरेदी केला, मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने शेतकरी हिताचा निर्णय म्हणून शेतकऱ्यांऐवजी यापुढे शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने व्यापारीवर्गाने एकजूट करत शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी लिलावात सहभागी न होण्याचे ठरवून बेमुदत बंदची हाक दिली आहे. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी शेतमाल आणला खरा, मात्र शुक्र वारी मिळालेल्या बाजारभावापेक्षा निम्म्या दराने किरकोळ व्यापारी व भरेकऱ्यांनी (चवळी दलाल) शेतमाल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. बाजार समितीत ढोबळी मिरची, काकडी, हिरवी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्या विक्र ीसाठी आल्या होत्या, मात्र फळभाज्यांची केवळ १० ते १५ टक्के आवक आलेली होती. आडत प्रकरणामुळे व्यापारीवर्गाने शेतमाल खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. एरवी शेतमालाने भरगच्च होणारी बाजार समिती शनिवारी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे ओस पडलेली होती. (वार्ताहर)