शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजारभावात घट

By admin | Updated: July 10, 2016 01:07 IST

आडत प्रकरण : शेतकऱ्यांची कोंडी

पंचवटी : शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असे आदेश शासनाने बाजार समित्यांना दिल्याने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शनिवारपासून लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे अवघा दहा टक्केमाल दाखल झाला आणि भावही मोठ्या प्रमाणात कोसळले.शनिवार सकाळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल किरकोळ व्यापारी व चवळी दलालांनी खरेदी केला, मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने शेतकरी हिताचा निर्णय म्हणून शेतकऱ्यांऐवजी यापुढे शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने व्यापारीवर्गाने एकजूट करत शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी लिलावात सहभागी न होण्याचे ठरवून बेमुदत बंदची हाक दिली आहे. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी शेतमाल आणला खरा, मात्र शुक्र वारी मिळालेल्या बाजारभावापेक्षा निम्म्या दराने किरकोळ व्यापारी व भरेकऱ्यांनी (चवळी दलाल) शेतमाल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. बाजार समितीत ढोबळी मिरची, काकडी, हिरवी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्या विक्र ीसाठी आल्या होत्या, मात्र फळभाज्यांची केवळ १० ते १५ टक्के आवक आलेली होती. आडत प्रकरणामुळे व्यापारीवर्गाने शेतमाल खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. एरवी शेतमालाने भरगच्च होणारी बाजार समिती शनिवारी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे ओस पडलेली होती. (वार्ताहर)