शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष मण्यांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:12 IST

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे.

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे. सततचा पाऊस व हवामानात अचानक होणारा बदल यामुळे द्राक्ष पिकावर विपरीत परिणाम होत आहे. द्राक्ष मण्यांना तडे जात असून द्राक्ष मणी सडून गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावून घेतला आहे.साधारण एक महिन्यात बाजारपेठ व निर्यातीसाठी तयार होत असलेल्या द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणावर सुमारे ८० टक्के नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागेवर करपा व डावण्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.फ्लॉवरीग स्टेजला कुज येणे, पोंगाअवस्थेत घड जिरून जाणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान घडत आहे. यासाठी शासनाने द्राक्ष उत्पादकांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे अशी मागणी ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक रकीबे परिवाराकडून करण्यात येत आहे. ठेंगोडा येथील सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रातील असलेल्या द्राक्ष बागेचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी सहाययक पुष्पा गायकवाड यांनी तयार करून वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे सांगितले.या संदर्भात महसूल विभागाने संबंधित नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी संबंधितांकडून करण्यात येत आहे.  गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजाने पुढील कांदा पीक घेण्यासाठी लागणारे कांदा उळे या पावसामुळे बहुतांशी ठिकाणी वाया गेले असून शेतकऱ्यांना पुन्हा उळे टाकण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक