शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:13 IST

पाटोदा : गेल्या दहा पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात हवामान बदल व झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे या पिकांवर मोठया प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्गाला पिके जगविण्यासाठी पिकांवर महागडी औषधे फवारण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाटोदा : रोगावर नियंत्रणासाठी शेतकरी वर्गाची औषध फवारणीसाठी धावपळ

पाटोदा : गेल्या दहा पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात हवामान बदल व झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे या पिकांवर मोठया प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्गाला पिके जगविण्यासाठी पिकांवर महागडी औषधे फवारण्याची वेळ आली आहे.आधीच शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असतांना पुन्हा ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. मागील आठवड्यात पाटोदा, ठाणगाव, कानडी, आडगावरेपाळ, विखरणी व परिसरातील काही गावांमध्ये बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकºााचे मोठे नुकसान झाले. हजारो क्विंटल कांदा या पावसाने भिजला.या भागात पाणी टंचाई असली तरी अनेक शेतकºयांनी कांदा व कांदा बियाणे तयार करण्यासाठी गुंठे दोन, गुंठे डोंगळे पिकाची लागवड केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून, थंडी, पाऊस, ऊन व ढगाळ वातावरण अशी स्थिती असल्यामुळे या पिकांवर मोठया प्रमाणात मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ही पिके जगविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकºयांनी पिकवलेल्या कोणत्याही पिकाला बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यात पुन्हा पिकांवरील रोगांनी डोके वर काढल्याने शेतकºयांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.गेल्या आठवडयात झालेल्या बेमोसमी पावसामुळे डोंगळा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, तसेच ढगाळ हवामानामुळे डोंगळे पिकावर मावा तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पुढील वर्षाच्या बियाणांसाठी हे पिक जगविणे गरजेचे असल्याने पिकावर महागडी औषधे फवारून पिके जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे.- वैभव भवर शेतकरी, ठाणगाव.