शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

प्रमुख रस्त्यांसह मुख्य बाजारपेठांमध्येही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे पोलिसी दंडुक्याच्या भीतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे पोलिसी दंडुक्याच्या भीतीने सलग पाचव्या वीकेंड बंदलाही नाशिककरांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांसह मुख्य बाजारपेठांमध्येही अपवाद वगळता शनिवारी (दि. ९) शुकशुकाट दिसून आला.

कोरोनामुळे सलग पाचव्या शनिवारीही नाशिककर घरातच थांबले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह, उपनगरे आणि रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. गत आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वीकेंडला वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. शहरात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना आवश्यक बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर यासारखी औषधे उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी कोरोनाचा धसका घेत घराबाहेर पडणे टाळले. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शासनाने लागू केलेले कडक निर्बंध लागू केले असून, या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पोलीसही रस्त्यावर असल्याने पोलिसी दंडुक्याची भीती आणि तापमानाचा चाळिशीपर्यंत वाढलेला पारा यामुळे नाशिककरांनी घरातच बसणे पसंत केले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीसह विविध कडक निर्बंध घालण्यात आले आहे, तर आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी या निर्बंधांची पोलिसांकडून आणखी काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, काही नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून बाहेर पडताना दिसले. मात्र, यात वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात भाजीपाला आणि फळ विक्रेते रस्त्यावर असले तरी त्यांना तासनतास ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.

मुख्य रस्ते, बाजारपेठेत शुकशुकाट

नेहमीच ग्राहकांची वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेतील रविवार कारंजा, मेनरोड, शालीमार परिसरात शनिवारी शुकशुकाट होता. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर या भागातील गर्दीवर नियंत्रण आले असून, शनिवारी सर्वत्र शांतता दिसत होती.