शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

आठवड्यात एक ‘ड्राय डे’

By admin | Updated: November 30, 2015 23:55 IST

पाणीपुरवठा राहणार बंद : पाच तासांच्या चर्चेनंतर महासभेचा निर्णय, दोन महिन्यांसाठी अंमलबजावणी

नाशिक : राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात केल्याने उद्भवलेल्या जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी बोलविलेल्या विशेष महासभेत शहरात दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवत डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पाणीवापराबाबत नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचेही यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले. सुमारे पाच तास चाललेल्या चर्चेत भाजपा वगळता सर्व सदस्यांनी अंगात काळे डगले घालत शासनाचा आणि पालकमंत्र्यांचाही निषेध नोंदविला.मागील आठवड्यात २३ नोव्हेंबरला मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अद्याप या निर्णयाचे लेखी आदेश महापालिकेकडे प्राप्त झालेले नाहीत. मात्र, महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात झाल्याने येत्या काळात उद्भवणाऱ्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी नियोजन आणि उपाययोजनांसंबंधी विशेष महासभा बोलाविली होती. यावेळी सुमारे ४० नगरसेवकांनी पाणी नियोजनासंबंधी उपाययोजना सुचवितानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता शासनाकडे दादही मागण्याचे ठरविण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी सध्याची एकवेळ पाणीकपात सुरू ठेवली तरी शहराला ८८ दिवस पाणी कमी पडणार असल्याची वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडली, तर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बाष्पीभवनामुळे होणारे पाणी वगळून शासनाने पाण्याचे आरक्षण केल्याचे आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, शासनाने महापालिकेवर कृत्रिम पाणीटंचाई लादली आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी पडणार असल्याने शहरातील विहिरी अधिग्रहित करण्यात याव्यात, जुन्या विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, टॅँकरची संख्या वाढवावी, शहरात ठिकठिकाणी बोअरवेल्स करावेत, सद्यस्थितीतील बोअरवेल्सवर जलपऱ्या बसविण्यात याव्यात, बांधकामांसाठी लागणारे पाणी त्वरित बंद करावे, प्रत्येक उद्यानात बोअरवेल्स करावेत, गंगापूर धरणातील गाळ काढण्यात यावा, किकवी धरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, जुन्या पाइपलाइन बदलण्यात येऊन पाणी गळती रोखावी, अशा सूचना करण्यात आल्या.