शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

आठवड्यात एक ‘ड्राय डे’

By admin | Updated: November 30, 2015 23:55 IST

पाणीपुरवठा राहणार बंद : पाच तासांच्या चर्चेनंतर महासभेचा निर्णय, दोन महिन्यांसाठी अंमलबजावणी

नाशिक : राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात केल्याने उद्भवलेल्या जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी बोलविलेल्या विशेष महासभेत शहरात दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवत डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पाणीवापराबाबत नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचेही यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले. सुमारे पाच तास चाललेल्या चर्चेत भाजपा वगळता सर्व सदस्यांनी अंगात काळे डगले घालत शासनाचा आणि पालकमंत्र्यांचाही निषेध नोंदविला.मागील आठवड्यात २३ नोव्हेंबरला मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अद्याप या निर्णयाचे लेखी आदेश महापालिकेकडे प्राप्त झालेले नाहीत. मात्र, महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात झाल्याने येत्या काळात उद्भवणाऱ्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी नियोजन आणि उपाययोजनांसंबंधी विशेष महासभा बोलाविली होती. यावेळी सुमारे ४० नगरसेवकांनी पाणी नियोजनासंबंधी उपाययोजना सुचवितानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता शासनाकडे दादही मागण्याचे ठरविण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी सध्याची एकवेळ पाणीकपात सुरू ठेवली तरी शहराला ८८ दिवस पाणी कमी पडणार असल्याची वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडली, तर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बाष्पीभवनामुळे होणारे पाणी वगळून शासनाने पाण्याचे आरक्षण केल्याचे आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, शासनाने महापालिकेवर कृत्रिम पाणीटंचाई लादली आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी पडणार असल्याने शहरातील विहिरी अधिग्रहित करण्यात याव्यात, जुन्या विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, टॅँकरची संख्या वाढवावी, शहरात ठिकठिकाणी बोअरवेल्स करावेत, सद्यस्थितीतील बोअरवेल्सवर जलपऱ्या बसविण्यात याव्यात, बांधकामांसाठी लागणारे पाणी त्वरित बंद करावे, प्रत्येक उद्यानात बोअरवेल्स करावेत, गंगापूर धरणातील गाळ काढण्यात यावा, किकवी धरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, जुन्या पाइपलाइन बदलण्यात येऊन पाणी गळती रोखावी, अशा सूचना करण्यात आल्या.