शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात एक ‘ड्राय डे’

By admin | Updated: November 30, 2015 23:55 IST

पाणीपुरवठा राहणार बंद : पाच तासांच्या चर्चेनंतर महासभेचा निर्णय, दोन महिन्यांसाठी अंमलबजावणी

नाशिक : राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात केल्याने उद्भवलेल्या जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी बोलविलेल्या विशेष महासभेत शहरात दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवत डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पाणीवापराबाबत नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचेही यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले. सुमारे पाच तास चाललेल्या चर्चेत भाजपा वगळता सर्व सदस्यांनी अंगात काळे डगले घालत शासनाचा आणि पालकमंत्र्यांचाही निषेध नोंदविला.मागील आठवड्यात २३ नोव्हेंबरला मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अद्याप या निर्णयाचे लेखी आदेश महापालिकेकडे प्राप्त झालेले नाहीत. मात्र, महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात झाल्याने येत्या काळात उद्भवणाऱ्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी नियोजन आणि उपाययोजनांसंबंधी विशेष महासभा बोलाविली होती. यावेळी सुमारे ४० नगरसेवकांनी पाणी नियोजनासंबंधी उपाययोजना सुचवितानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता शासनाकडे दादही मागण्याचे ठरविण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी सध्याची एकवेळ पाणीकपात सुरू ठेवली तरी शहराला ८८ दिवस पाणी कमी पडणार असल्याची वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडली, तर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बाष्पीभवनामुळे होणारे पाणी वगळून शासनाने पाण्याचे आरक्षण केल्याचे आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, शासनाने महापालिकेवर कृत्रिम पाणीटंचाई लादली आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी पडणार असल्याने शहरातील विहिरी अधिग्रहित करण्यात याव्यात, जुन्या विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, टॅँकरची संख्या वाढवावी, शहरात ठिकठिकाणी बोअरवेल्स करावेत, सद्यस्थितीतील बोअरवेल्सवर जलपऱ्या बसविण्यात याव्यात, बांधकामांसाठी लागणारे पाणी त्वरित बंद करावे, प्रत्येक उद्यानात बोअरवेल्स करावेत, गंगापूर धरणातील गाळ काढण्यात यावा, किकवी धरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, जुन्या पाइपलाइन बदलण्यात येऊन पाणी गळती रोखावी, अशा सूचना करण्यात आल्या.